पुणे : महापुरुषांची स्मारकं गरजेची आहेतच परंतु त्याहीपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे म्हणत खासगी धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.. “वंचितच्या समितीकडून एमआयएमसोबत चर्चा सुरू आहे. एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे,” ” मागील काही दिवसांपासून आमच्या दोन्ही पक्षात वाद सुरू असल्याची माध्यमांमध्ये चर्चा ऐकण्यास मिळत आहे. पण आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे वाद किंवा निवडणुक लढविण्याबाबत चर्चा करण्याचे दारे बंद करण्यात आली नाही. उलट त्यांच्याकडून दाराला कुलूप लावण्यात आलेले नाही. त्यांच्याकडे त्या कुलूपाची चावी आहे,” असं सांगत “एकत्र येण्यास तयार आहोत,” असं आंबेडकर म्हणाले.
पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. आंबेडकर म्हणाले, राज्यात काही भाग ओला आहे तर काही भाग हा दुष्काळी आहे. राज्यात जशी सरकारी धरणं आहेत तशीच अनेक खाजगी धरणे देखील आहेत. टाटाच्या पाच धरणांमधून वीज निर्मिती केली जाते. सध्या राज्यात विजेचे अतिरिक्त उत्पादन हाेत आहे. विजेची जास्त मागणी असते तेव्हा देेखील अतिरिक्त वीज उरत आहे. त्यामुळे या धरणांमधून करण्यात येणारी वीज निर्मिती टप्प्याटप्प्याने बंद करुन या धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे. टाटा धरणामधील पाणी नद्यांच्या मार्फत उजनी धरणापर्यंत पाेहचवता येईल. तसेच तेथून मराठवाड्यातील विविध भागाला पाणी पुरवता येईल. वंचित सत्तेत आल्यास टाटा ग्रुपशी बाेलून ही याेजना अमलात आणता आणेल असा विश्वास देखील त्यांनी यावेेळी व्यक्त केला.
तसेच वीज निर्मिती करण्याचे इतर मार्ग असून त्याचा विचार सरकारने करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच सध्या राज्यात वीजेचा कृत्रिम तुटवडा असून सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास वीज सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविता येणे शक्य असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले
मुख्यमंत्र्यांनी घाबरुन वंचित विराेधपक्ष असेल असे म्हंटले
मुख्यमंत्र्यांनी वंचित हे विराेधपक्षात असेल असे म्हंटले हाेते, ते त्यांनी वंचितला घाबरुन म्हंटले हाेते. आम्ही विराेधीपक्षात नाहीतर सत्तेत असू असा विश्वास देखील आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केला.