पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा निव्वळ पाकिस्तान ला आपण कसे धाकात ठेवू शकतो ,दहशतवाद्यांशी सामना कसा करू शकतो याच मुद्द्यांवर निवडणूक लढवीत असल्याचे दिसून येते आहे तर राहुल आणि प्रियांका गांधी हे २ भावंडे ‘न्याय ‘ या योजनेवर भर देत त्या आधारे गरिबी हटाव चा इंदिराजींचा नारा देत या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे दिसते आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत पेट्रोल ,डीझेल ,गॅस दरवाढीने हैराण झालेली जनता ,घरांच्या,जमिनींच्यावाढत राहणाऱ्या आवाक्याबाहेरील किमती म्हणजेच ..महागाई,बेरोजगारी …’रोटी ,कपडा और मकान’ अशा व्यक्तिगत पण महत्वाच्या विषयांना निवडणुकीतील प्रचारात आता स्थान मिळेनासे झालेले दिसते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी दक्षिण भारताच्या दौऱ्यावर होते. राहुल यांनी तामिळनाडूत ४ सभा घेतल्या. त्यांनी २१ दिवसांत ४४ सभा घेतल्या. मोदींनी १३ दिवसांतच ४२ सभा घेतल्या. मोदींनी ३५ सभांत पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकचा, तर राहुल यांनी ३१ सभांत ‘न्याय’ या किमान उत्पन्न हमी योजनेचा उल्लेख केला. दुसरीकडे मोदींनी प्रत्येक सभेत काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्या पक्षाला पाकिस्तान समर्थक ठरवले. काँग्रेसला तुकड्यांची टोळी म्हटले. एवढेच काय शिवसेनेने यावेळी कॉंग्रेस च्या राजवटीत झालेल्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत कॉंग्रेसवर टीका करणारी जाहिरात बाजी सुरु केली आहे.आणि पाकिस्तानवर केलेल्या लष्करी कारवाईचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अशा जाहिरातीतून शिवसेना करताना दिसते आहे .
कमलनाथांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर छाप्यांचा रोज उल्लेख
-मोदींनी गेल्या १० सभांत भोपाळमधील छाप्यांचा उल्लेख तुघलक रोड घोटाळा असा केला.
-याउलट, सरकार घाबरलेले आहे, असे काँग्रेस म्हणत आहे.
– मोदी सरकार ,पोलीस ,सीबीआय ,सह सरकारी यंत्रणांचा वापर विरोधकाना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असल्याचा कॉंग्रेस आरोप करत आली आहे.
– मोदींनी चौकीदार, नामदार, कामदार, तुकड्या-तुकड्यांची टोळी यांसारख्या शब्दांचा जास्त उल्लेख आपल्या भाषणातून केला. या वेळी ‘शहजादा’ शब्दाचा फक्त दोनदाच उल्लेख.
-मोदींच्या सभेत काँग्रेसमुक्त भारत आणि ‘सबका साथ-सबका विकास’ शब्द ऐकू आले नाहीत.
– राहुल यांनी सर्वात जास्त नरेंद्र मोदी, अनिल अंबानी, नीरव मोदी, मल्ल्या आणि चौकसीचे नाव घेतले. तीन सभांत त्यांनी दहशतवादी अझहर मसूदचाही उल्लेख केला.
-राहुल यांनी राफेल चा उल्लेख फक्त तीन सभांत. युवक, नोटबंदी, शेतकरी, जीएसटीचा उल्लेख आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त सभांत केला.
प्रामाणिक चौकीदार चालेल की भ्रष्टाचारी?
-देश एका सुरात बोलत आहे याचा मला आनंद आहे. जे प्रथमच मत देणार आहेत त्यांना मी विचारू इच्छितो की, राष्ट्राशी समझोता मंजूर आहे? प्रामाणिक चौकीदार चालेल की भ्रष्टाचारी नामदार हे आता निश्चित करायचे आहे.असे नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात नमूद केले आहे .