पुणे- आपण जाणव्यांची मक्तेदारी घेतली आहे काय ? असा जळजळीत सवाल करीत गुजरात आणि हिमाचल च्या विजयाने हुरळून जाण्याचे कारण नाही … अगर पंचाई कद्से, और बाते औकातसे बढ जाये तो सुरज डूबनेवाला है अशा मार्मिक शेरोशायरीतला टोला महापालिकेतील कॉंग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेतून भाजपला दिला.
गुजरात आणि हिमाचल राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा अभिनंदन करणारी तहकुबी पालिकेच्या मुख्य सभेत मांडण्यात आली . तेव्हा या तहकुबीवर भाषण करताना अरविंद शिंदे यांनी नेमके काय म्हटले आहे .. पहा आणि ऐका …