पुणे : भारतातील 15 उद्योगपतींसाठी सव्वातीन लाख कोटींवर पाणी पडले, नीरव मोदी आणि अनिल अंबानी यांनी देशाला किती नोकऱ्या दिल्या असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे पुण्यातील भारती विद्यापीठासह अन्य विद्यार्थांशी संवाद साधताना उपस्थित झालेल्या प्रश्नावर केला . प्रत्येक गरिबाला ७२ हजार रुपये वर्षाला द्यायला कुठून आणणार असा हा प्रश्न होता
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना दर वर्षी 72 हजारांची रक्कम दिली जाईल, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न त्यांना एका विद्यार्थ्यानं विचारला. यावर आम्ही नीरव मोदी, अनिल अंबानी, मेहुल चोकसी आणि विजय माल्ल्याकडून पैसे आणून गरिबांना देऊ, असं उत्तर त्यांनी दिलं. ‘किमान मासिक उत्पन्न 12 हजारांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजारांची आर्थिक मदत दिली जाईल. याचा फायदा देशातील 20 टक्के जनतेला होईल,’ असा दावा राहुल यांनी केला होता. या योजनेला काँग्रेसला न्याय (न्यूनतम आय योजना) असं नाव दिलं आहे.
”भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे श्रेय हवाई दालालाच मिळायला हवे. भारताने हवाई हल्ला करणे आवश्यक होते. भारत हा शक्तिशाली देश आहे हे वेळोवेळी दाखवून देणे गरजेचे आहे आणि ते आपल्या देशाच्या सैन्याने दाखवून दिले. आमचा विरोध फक्त सैन्याच्या नावावर होणाऱ्या राजकारणाला आहे. राजकारण्यांनी एअर स्ट्राईकचे श्रेय घेणे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला काही हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी निवडक प्रश्नांना उत्तरे दिली. भारतात उच्चशिक्षित विद्यार्थांनाही अपेक्षेप्रमाणे मोबदला दिला जात नाही या प्रशांचे उत्तर देताना त्यांनी ”आपली विद्यापीठे ही नोकऱ्यांशी जोडली गेलेली नाहीत, त्यामुळे बोरोजगारीचा मुद्दा उपस्थित होतो,” असे मत व्यक्त केले. ”आपल्याकडे तरुणांच्या कौशल्याला किंमत नाही म्हणून भारत दर दिवसाला 27 हजार नोकऱ्या गमावतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
”तुम्ही मला विचारलेले काही प्रश्न मला आवडणारही नाहीत. मात्र, मी त्यांची उत्तरे देत आहे. माझ्यात तेवढी हिम्मत आहे की मी तुमच्या समोर उभा राहून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे,” असेही ते म्हणाले.यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाविषयी बोलताना सावध भूमिका घेत माझे लग्न माझ्या कामाशी झाले आहे, असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे मलिश्का आणि अभिनेता सुबोध भावे यांनी केले.