पुणे-हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेण्यास घाई केली असे प्रतिपादन राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटिल यांनी येथे केले.
विधानसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज (ता.६) पुण्यातील बारामती होस्टेल येथे आयोजित करण्यात आली . या बैठकीमध्ये राष्ट्रवादीची खलबते सुरू आहेत. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत.
या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची यादीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच मित्र पक्षांसोबत जागावाटप कशाप्रकारे करता येईल यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष इंदापूर जागेवरून खुलासा केला. ते म्हणाले, की राष्ट्रवादीच्या यादीमध्ये इंदापूर सोडून सर्व जागांवर चर्चा करण्याचे ठरले आहे.
इंदापूरच्या जागेसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शरद पवार हे निर्णय घेतील असे ठरले होते. मात्र, त्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी मेळावा घेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात रोष व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेबाबत टोकाची भूमिका घेतलेली नव्हती, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबत खुलासा केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेण्यास घाई केली असेही ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये आमचा मित्र पक्ष काँग्रेससोबत चर्चा केली आहे. काही जागांच्या बाबतीत आम्हाला उमेदवार अंतिम करायचे आहेत त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.