मुंबई- एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपावरील वादातून अखेर फूट पडली आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मान राखला नाही, त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले.
वंचितकडून 8 जागांची ऑफर होती, तर एमआयएम 100 जागांसाठी आग्रही होती. 8 जागांची ऑफर एमआयएमला अमान्य असल्यामुळे मागील दोन-चार दिवसांपासूनच एमआयएमकडून बाहेर पडण्याचे संकेत देत होते. त्यामुळे अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नव्हती. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. विशेष म्हणजे या यादीत औरंगाबाद मध्य मतदारसंघाचाही समावेश नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत,