पुणे- ‘करायला गेलो गणपती ,आणि झाला मारुती अशी मराठीतील म्हण आहे …त्याप्रमाणे पुण्याच्या एका बड्या भाजप नेत्याची अवस्था मुख्यमंत्र्यांपुढे झाल्याचे, स्वप्न एका भाजपच्या कार्यकर्त्याला रात्री पडले .आणि त्याने ते ‘मायमराठी’ शी सकाळी सकाळी शेअर केले … असे म्हणतात ..पहाटे पडलेले स्वप्नखरे होते .. ते सोडा, खरे होऊ ,खोटे होऊ द्यात पण काय होते ते स्वप्न जरा पाहू यात ..
.ते गेले एका खासदाराचे गाऱ्हाणे घेऊन ..याच्यामुळे बदनामी होतेय ,पक्षात संदिग्धतेच वातावरण निर्माण होतेय ,आमच्यासारख्या निष्ठावंतांची तोंड तुमच्यामुळे गप्प आहेत कारण तो तुम्हीच माझा नेता म्हणून प्रचार करतोय त्याला आवर घाला ,नाहीतर कठीण आहे ‘ …
….तुम्ही निष्ठावंत ,निष्ठावंत म्हणून ओरडू नका, माहिती आहे तुम्ही ज्येष्ठ आहात …पण निव्वळ या उपाध्या लाऊन पक्षाचे हीत साधले जात नाही, सत्ता येत नाही ..आणि तुम्हीच तर प्रचार केलात ..पुढे सत्ता येईल कि नाही सांगता येत नाही …असो तुम्ही पुण्याचे नेते समजता स्वतःला.. पण पाहता स्वतः पुरते , कधी संपूर्ण पुण्याचा सर्व विधानसभा मतदार संघाचा विचार केला आहे काय ? तुम्ही कार्यकर्ते घडवलेत काय ? सांगा ,कोण ,कोण कार्यकर्ते तुम्ही घडवलेत .. खडकवासला विधानसभा मतदार संघातून तापकिरांना किती वेळा लढवायचे ? त्यांच्या शिवाय दुसरा कोणी आहे काय पर्याय तिथे ,तुम्ही संधिसाधू स्वार्थी राजकारण केले ..कधी दुसरा कार्यकर्ता उभा राहू दिला नाही , मुंडेंचे समर्थक असलेले डवरी यांचे काय झाले ठाऊक आहे सर्वांना , जुने कार्यकर्ते प्रकाश गोरे आणि मिलिंद दास्ताने हे पक्षापासून का दूर गेले .खडकवासल्यात तापकीरांनी स्वताचेच घोडे दामटले आणि कार्यकर्त्यांचा खडखडाट झाला .माझ्याशिवाय विधानसभेला कोणी नाही हि स्थिती निर्माण केली आणि आता त्यामुळे तिथे राष्ट्रवादी जड होऊन बसली आहे त्यांच्याकडे 4/4 तगडे घोडे रेस मध्ये आहेत. आपल्याकडे एकच … एखाद्याला खेचून आणू शकता काय तुम्ही भाजपमध्ये ..आणला तर परत हा जुना तो नवा वाद घालीत बसणार … अहो पुन्हा पक्षाला मागे नेऊन ठेवता आणि स्वतःला निष्ठावंत म्हणवून घेता . तीच परिस्थिती हडपसर विधानसभा मतदार संघात आहे.टिळेकर नकोय आम्हाला ..तो पडणार असंच एलायबी रिपोर्ट आहे तिथे तगडा पर्याय आहे काय तुमच्याकडे … सोडा .. हा फुसका निष्ठावंतांचा जयघोष स्वतःपुरते पाहणारे स्वार्थी राजकारणी तुम्ही..प्रसंगी कलमाडी आणि पवारांशी तुमची नाळ जुळलेली पुणेकरांनीच पाहिली ..
कॉंग्रेस कडे नाहीय तसा आपल्याकडेही लोकसभेला देखील तगडा उमेदवार नाही हे हि लक्षात घ्या ..साऱ्यांची मदार एकावरच .. तोच कॉंग्रेस राष्ट्रवादीला हि हवाय ..
-अहो साहेब , जोशी ,छाजेड ,शिंदे असे अनेक आहेत कॉंग्रेस मध्ये …
…पहा ,लागलात वकिली करायला कॉंग्रेसची ..भिमालेंना विचारा, यातला सेटलमेंट पंटर कोण आहे …आणि राहिले बाकीचे त्यांची पालिकेला तरी निवडून येण्याची क्षमता आहे काय ?हे सारे कॉंग्रेस वाले तसे तुम्ही हि जाणून आहात …त्यांच्याकडे सत्ता नाही पण आपल्याकडे सत्ता असून हि तुम्ही तगडे उमेदवार देऊ शकत नाही हे लक्षात घ्या ..त्या तुमच्या वर्तुळातल्यांना सांगा ..आणि बडवा हवा तेवढा ‘निष्ठावंतगिरी चा ढोल..पण त्याने निवडणुका जिंकता येत नाहीत हे देखील लक्षात घ्या ..आता तुम्हाला शिकाव्यचे किती ..तब्बेतीची काळजी घ्या …जा ..बघू आम्ही, तुम्हाला ज्याचा अवेळी त्रास होतो त्याचे काय करायचे ते करूच आम्ही …..
(अखेर स्वप्न च हे ..पण ..त्याची बातमी होऊ शकत नाही ? असा प्रश्न अनेक उपस्थित करतील…पण ‘तोता मैना च्या काल्पनिक राजकीय सफरी ‘ लिहिलेल्या आम्हाला राहवले नाही ..म्हणून ‘सपने अपने अपने ‘ हि मालिका येथे सुरु करीत आहोत. )