काय म्हणाले डॉ .सप्तर्षी –
हि लोकसभेची निवडणूक ,गल्ली ची नाही ,ग्रामपंचायत वा नगरपालिकेची नाही हे लक्षात घ्या .
५ वर्षानंतर वेळेवर निवडणुका याबाबत मोदींचे कौतुकच आहे.
प्रचारात ते केलेल्या कामावर फार बोलणार नाहीत , घोषणा करतील आणि पुलवामा हल्ल्यावर बोलतील .
कॉंग्रेसला भूतकाळावर शिव्या घालतील.निवडणुकीची लढाई जोरदार होईल.
एक गांधी प्रणीत राष्ट्रवाद आणि दुसरा हिंदुत्ववादी राष्ट्रवाद .
जातीच्या उतरंडीचा आणि जुनी समाज रचना पुन्हा आनंरा यांचा समाजवाद
झुंडशाही,लोकांना भयभीत करणे जिथे सत्ता नाही तिथे अराजकता माजविणे हे काम केले .
मोदींची राजवट एकाधिकारशाही राबविणारी .त्याबाबत ५० टक्के काम त्यांनी या ५ वर्षात पूर्ण केले .
सीबीआय ,न्यायालये,रिजर्व बँक यांच्या अधिकारात हस्तक्षेप केले.हे विषय पंतप्रधानांनी हाताळले .
आपली व्यवस्था हि कॅबिनेट व्यवस्था आहे जिचा पंतप्रधान हा नेता असतो .पण मोदींच्या नावावर निवडणूक लढविणे याला अध्यक्षीय पद्धत म्हणावे लागेल.कोणीतरी सिनिअर नेता असतो .पण इथे अडवाणींना दमदाटी करून घरी बसविले.
एकाधिकारशाहीच्या विरोधात मतदान करणे हाच राष्ट्रभक्तीचा मार्ग आहे.
मोदींना जेव्हा वाटेल हुकुमशाही पद्धत चुकीची तेव्हा आरएसएस त्यांना बाजूला सारेल .
कॉंग्रेस मध्ये अनेक दोष पण यावेळी कॉंग्रेसला मतदान करा .त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले .लाजेकाजे का होईनात ते हुकुमशहा होणार नाहीत .
इदिराजींनी एकाधिकारशाही राबविण्याची चूक केली होती पण ती नंतर त्यांना उमगली .
भाजपला काही काळ तरी सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे .सत्याग्रह करून कॉंग्रेसला करेक्ट करता येईल पण यांना मात्र करता येणार नाही .
शासन संस्था हाथी आली कि ते किती माज करू शकतात ह्याची प्रचीती आली आहे.
ज्याला ज्याला शक्य आहे त्याने त्याने भाजपला पराभूत करावे .
विखे हे राजकारणातील उठवळ नेते -त्यांचे वडील माझे मित्र होते ते कम्युनिस्ट होते,पण गेले कॉंग्रेस मध्ये आणि मंत्री झाले शिवसेनेत .
नगर दक्षिण मध्ये आपल्या मुलाच्या विरोधात काम करून राधाकृष्ण विखेपाटील यांनी हनुमानाप्रमाणे आपली कॉंग्रेस भक्ती दाखवून द्यावी