पुणे : गेल्या ४० वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारी व भ्रष्टाचारावरोधात लढा दिला. तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पहात नाही. पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला हे सांगा. मी गुन्हा केला असेल, तर राजकारणातून निवृत्त होईन, असे सांगत तुमचा मंत्री आणि तुमच्या मनातील नाथाभाऊ मीच आहे, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुण्यातील युवा पिढीशी एका कार्यक्रमातून संवाद साधला.
एकनाथ खडसे म्हणाले, गुन्हेगारी विरोधात लढा देऊनही माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे संबंध जोडले गेले. ते खरे की खोटे हे कोणी पहात नाही. त्यामुळे ही खंत मी वारंवार बोलून दाखविणार आहे. गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारीविरोधात लढा उभारला होता. मात्र आता इतरांसारखे केव्हा झालो हे लक्षात आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, कोणाकडे पाहून राजकारणात येण्याची आता हमी देता येत नाही. राजकारण्यांपेक्षा उत्कृष्ट अभिनेते व कलाकार कोणीही नाही. वरुन आणि आतून वेगवेगळे चेहरे पहायला मिळतात. राजकारणात कृतघ्न माणसांची संख्या जास्त असून राजकारणाची दशा आणि दिशा बदलायची असेल, तर युवकांनी राजकारणात यायला हवे.
काय म्हणाले –खडसे —
1)दाऊदच्या बायकोशी कशाला बोलू ..आहे ना,माझी बायको अजून घरी …
2)सलमान खान ,शाहरुख खान यापेक्षा हि मोठे अभिनेते ३)राजकारणात कृतघ्न माणसांची संख्या जास्त आहे ,कृतज्ञ नाही….
ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना तुम्ही घरी बसवू शकता …
4)संसदेमध्ये ,विधानसभेत अलीकडे फार काही चर्चा होत नाही .
5)मी 1977 मध्ये सरपंच झालो ,तशी मेहनत करत ,काम करत इथपर्यंत आलो .बटन दाबले अन आमदार झालो अन मंत्री झालो असे नाही .
6)एकही राजकीय पक्ष छातीठोक पणे सांगू शकत नाही कि आम्ही दिलेली आश्वासने १०० टक्के पाळली ,पूर्ण केली …