सोलापूर -फडणवीस भले तुम्ही मुख्यमंत्री असाल पण तुमची शरद पवारांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही . काही करा पण राष्ट्रवादीचा नाद करू नका ,तुमचे गुरु पवारसाहेबांचे बोट धरून राजकारणात आले ,किमान जनाची नाही तर मनाची बाळगा अशा आशयाचे मुख्यमंत्र्यांना उत्तर आज राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी येथे दिले .
आज मुंबईत भाजप वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती , या टीकेचा समाचार तातडीने मुंडे यांनी सोलापूरच्या भाषणातून घेतला .
ते म्हणाले ,जो पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे त्यांच्या नेत्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. स्थापना दिवशीच्या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणात मात्र केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दहशत दिसत होती. दिल्लीतून रिंगमास्टर आल्याने त्यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना केवळ जनावरे दिसत होती.
आज भाजपचे नेते गेल्या चार वर्षात काय केलं ते भाषणात सांगातील, मुख्यमंत्री सांगतील की त्यांनी काय विकास केला मात्र त्यांच्या संपूर्ण भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच उल्लेख होता. आज मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असल्यासारखे बोलत होते. यांना माहिती आहे राज्यात भाजपची सत्ता जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता येईल. सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्याप्रमाणे बोलल्यापेक्षा आता पासूनच सवय म्हणून ते बोलेल असावेत
फडणवीस साहेब तुम्ही भले राज्याचे मुख्यमंत्री असाल मात्र पवार साहेबांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही. काही करायचे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी नाद करायचा नाही, मुख्यमंत्री महोदय जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, तुमचे गुरू आमच्या गुरूचे बोट पकडून राजकारणात आले आहेत हे बहुदा तुम्ही विसरलात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय पवार साहेबांचे वय काय ? पवार साहेबांचे कर्तृत्व काय तुमचे कर्तृत्व काय ? हे आठवून पहा
तुमच्या १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले त्यांची साधी चौकशी तुम्हाला करता येत नाही, मी मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो की मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांची चौकशी करावी तरच म्हणता येईल की तुमचे सरकार पारदर्शक आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी न्यायालयीन चौकशी करावी.
आज विरोधी पक्षाला लांडगे म्हणतात २०१४ च्या वेळी तुम्ही महायुतीच्या नावाखाली एकत्र आले होते त्याला कशाचा कळप म्हणायचा ? .