पुणे- भाजपने सेनेला युतीसाठी इडीची भीती घातली कि चिरीमिरी द्यायचा प्रयत्न केला ?असा सवाल तिकडे मुंबईत सेना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांत युतीसाठी बैठक होत असताना पुण्यात कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी पत्रकार परिषदेतून केला .ज्यांनी भाजपवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका केली.जे कालपर्यंत एकमेकांची औकात काढत होते, जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा करीत होते, तेच आज पुन्हा केवळ सत्तेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालायला निघाले आहेत. ही युती महाराष्ट्राच्या जनतेची मोठी फसवणूक आहे. पण महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. अशा अनैतिक, अभद्र आणि स्वार्थी, मतलबी युतीला धडा शिकवायचा, हे जनतेने अगोदरच ठरवून टाकले आहे, असा इशाराही विखे पाटील यांनी यावेळी दिला. चारच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपला निर्लज्ज म्हटले होते. ‘चौकीदार चोर है’चा नाराही त्यांनी बुलंद केला होता. अगदी आजसुद्धा सामनाच्या अग्रलेखात भाजप पुलवामातील शहिदांच्या मढ्यावरचे लोणी खात असल्याचे शिवसेनेने म्हटले होते,त्यांनी चर्चेला जाणे म्हणजे मांडवली करायला जाणे होय असे सांगत पहा आणि ऐका राधाकृष्ण विखे पाटील नेमके काय म्हणाले ….