पुणे-पक्ष सांगेल ते करणार ,लढ म्हटले तर लढणार ,नको लढू म्हटले तर नाही लढणार … असे सांगणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यापुढे थेट प्रश्न आला …आणि पक्ष म्हटला मुख्यमंत्री व्हा तर ….दादा लगेच उत्तरले …मग काय सोडणार काय ?
राज्यात आमची ताकद चांगलीच वाढत आहे. अनेकजण आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. 90 टक्के भाजपचे लोक राज्यात विविध पदावर काम करत आहेत. युती होणार आहे, आमच्या एकट्याच्या 200 जागा येणार असल्या तरी सत्तेत निम्मा निम्मा वाटा होईल. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलत होते.
पुण्यात पत्रकार श्रमिक संघाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,” राज्यात आमची ताकद चांगलीच वाढत आहे. अनेकजण आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. तसेच राज्यात 90 टक्के जागांवर आमचेच लोक आहेत. यामुळेच आमची ताकद आणखीन वाढेल. शिवाय आमच्या एकट्याच्या 200 जागा येणार असल्या तरी सत्तेत निम्मा वाटा होईल. आमची शिवसेनेसोबतची युती अभेद्य आहे.”
“मुख्यमंत्री पदाबाबत मला माहिती नाही. अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात काय ठरले माहीती नाही, पण ते जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असेल. शरद पवार यांनी तीन जण पक्ष सोडून गेले याचा धसका घेतलाय, अजून जाणारे आहे त्याची तयारी ठेवावी.” असा टोलाही त्यांनी शरद पवारांवर लगावला.