दिल्ली की 70 में से 67 पर आप जीत रहे हैं.;ये दिल्ली की जीत है.बस अब खुद में अहंकार लाये बिना दिल्ली की सेवा करनी है!जय हिन्द!— अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली, – अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला भक्कम आघाडी मिळाली आहे. दिल्लीत आप तब्बल ६६ जागांवर आघाडीवर असून भाजपा फक्त ३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. दरम्यान केजरीवालांच्या नेतृत्त्वात दिल्ली आता जागतिक दर्जाचे शहर बनेल अशी अपेक्षा असे वक्तव्य किरण बेदी यांनी केले आहे तसेच तसेच उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी भाजपचे आभार मानून विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केले आहे यामुळे राजकीय समीक्षक बुचकळ्यात पडले असले तरी ‘ सच्चे का बोलबाला . झुठे का मुह काला ‘ या उक्तीचा अनुभव आज देशात आला तमाम दिल्लीकरांना संपूर्ण भारताने जणू या निकालानंतर मनोमन सलाम केला आहे असे सोशल मिडीयावर चित्र होते . ‘हा अदभुत विजय दिल्लीतील जनतेचा आहे. मात्र, विजयाचा अहंकार बाळगू नका. कारण याच अहंकारामुळेच भाजप, काँग्रेसचा पराभव झाल्याचे ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे.दिल्लीतील भ्रष्टाचार आणि व्हीआयपी कल्चर संपुष्टात आले आहे. मी जनतेचा मुख्यमंत्री बनणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.
उत्कंठा वाढविणा-या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा फैसला आज झाला आहे. राजधानीतील तख्तासाठी भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात थेट लढत झाली . सकाळी ८ वाजता १४ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. दिल्लीतील ७० जागांसाठी ६७३ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीतील ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोल्समध्ये आम आदमी पक्षाला कौल देण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासून आम आदमी पक्षाने आघाडी घेतली. मतमोजणीच्या तासाभरानंतरच आपने बहुमताचा आकडा ओलांडत भाजपाला धक्का दिला. चांदनी चौक या मतदारसंघात भाजपाच्या वाटेला फक्त ९१ मतं आली असून या मतदारसंघात भाजपा सध्या तिस-या स्थानावर आहे. विशेष बाब म्हणजे याच मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नेते डॉ. हर्षवर्धन यांना भरभरुन मतं दिली होती.
१५ वर्ष दिल्लीत सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत एकाही जागेवर विजयी मिळवता आलेला नाही. काँग्रेसच्या दृष्टीने ही अत्यंत निराशाजनक बाब असून या पराभवानंतर ‘प्रियंका गांधींना आणा, काँग्रेसला वाचवा’ अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. दिल्लीत शीला दिक्षीत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सत्तेवर होता. तब्बल १५ वर्ष दिल्लीचे तख्त काँग्रेसकडेच होते. मात्र २०१३ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाने काँग्रेसच्या नाकी नऊ आणले. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ८ जागांसह थेट तिस-या स्थानावर फेकला गेला. तर आम आदमी पक्षाने २८ जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली उतरला होता. काँग्रेस पक्षनेतृत्वानेही दिल्लीत प्रचारसभा घेतल्या असल्या तरी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. याचे पडसाद निवडणुकीतही दिसून आले आहे. यंदाच्या निवडणूकीत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.