पुणे- व्यापाऱ्यांची एल बी टी बंद केली … दुष्काळी शेतकऱ्यांसाठी काय ? असा सवाल करीत पिंपरी चिंचवड चा समावेश केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात करावा यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे असे राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी सांगितले
ते म्हणाले , ‘सरकारची अवस्था नाचता येईना अगंण वाकडं…अशी आहे नाचता येईना अगंण वाकडं… ही म्हण सरकारसाठी तंतोतंत लागू पडत आहे. एकीकडे ते काय म्हणतात, ‘आम्ही तिजोरी सगळी खाली करू’ आणि दुसरीकडे म्हणतात, ‘आधीच्या सरकारमुळं तिजोरी मोकळीच आहे. मग मोकळी तिजोरी खाली कशी करणार ? दोन्ही बाजूणं कसं काय बोलू शकतात ?
यांनी टोल आणि एलबीटी बंद करण्यासाठी तरतूद केली. पण राज्यावर दुष्काळाचे सावट असताना लोकांना वाचवण्यासाठी निधी द्यायचा सोडून एलबीटी माफ करत बसले आहेत. एलबीटी एप्रिलमध्येही बंद करता आला असता. आज महत्त्वाच काय ? एलबीटी, टोल बंद करणं की बळीराजा अक्षरशः पिचलेला आहे. आत्महत्या करत आहे. त्यांना वाचवणं ? त्यांना आधार देण्याची खरी गरज आहे. याकरिता संपूर्ण राज्याची यंत्रणा कामाला लावली पाहिजे.
स्मार्ट सिटीसाठी पंतप्रधानांना भेटणार
अजित पवार असे हि म्हणाले कि , केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्याच्या मागणीसाठी महापालिकेच्या शिष्टमंडळासह दिल्लीत जाऊन नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश झालेला नसला तरी आम्ही अजून आशा सोडलेली नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पात पिंपरी-चिंचवडचा समावेश होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू. शहरातील तीनही आमदार आणि खासदारांच्या नाकर्तेपणामुळेच केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश होऊ शकला नाही.
राज्य शासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित प्रस्ताव पाठविला होता. त्यातून केंद्र शासनाने फक्त पुणे शहराची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड केली गेली. यासंदर्भात पिंपरी-चिंचवडच्या नावाचाही यादीत समावेश व्हावा, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.