नवी दिल्ली
-वादग्रस्त ललित मोदीला मदत केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी आपण मानवतावादी भूमिकेतून ललितला मदत करण्याचे कबुल केले आणि सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत फोनवर चर्चा करताना मंत्रिपदाच्या राजीनाम्याची तयारीही दर्शविल्याचे वृत्त आहे .त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केल्याचे वृत्त आहे सुषमा यांनी याप्रकरणी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, काँग्रेसने स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजवर इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) चे माजी कमिशनर ललीत मोदी यांना मदत केल्याचा आरोप आहे. ईडीचे आरोपी ललीत मोदी यांना सुषमा स्वराज मदत करत आहेत. या संबंधी एका इंग्रजी वृत्तवाहिनीने ईमेल आणि कागदपत्रे असल्याचाही दावा केला आहे. ललीत मोदी यांना ब्रिटनमधून बाहेर काढण्यासाठी सुषमा स्वराज यांनी स्वतः मदत करण्याचा प्रयत्न केला होता. २०१३ मध्ये लोकसभेत अपक्ष नेतेपदी असताना सुषमा स्वराज यांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या ब्रिटनमधील प्रवेशासाठी ललीत मोदी यांची मदत घेतली होती, आणि त्याच्या बदल्यात त्यांनी ललीत मोदी यांची मदत केल्याचा आरोप करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, सुषमा स्वराज यांनी जे केलं ते योग्य होतं आणि मला ते योग्यच वाटतं. सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना केलेली मदत ही मानवतावादी दृष्टिकोनातून केलेली मदत होती.