मुंबई -“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुणाविषयी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. ते काय बोलतात याला मी महत्त्व देत नाही. आजही अनेक लोकांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करावा लागतो”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला फेटाळून लावले आहे
आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून पुरंदरे यांची पाठराखण करीत पवारांवर टीकेचा भडीमार केला होता याबद्दल बोलताना पवार म्हणाले .” राज ठाकरेंच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही. त्यांनी कोणाबद्दल काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल जो काही वाद सुरू आहे, त्या वादावर पडदा पडावा असे मला वाटते”, असं पवार म्हणाले.