पारगाव-सत्तेवर येण्याआधीच विरोधकांपैकी कोणी म्हणते मी मुख्यमंत्री होणार, कोणी म्हणते मी गृहमंत्री होणार. हे म्हणजे म्हैस पाण्यात आणि मोहोर चालू असा प्रकार आहे. अशी टीका आंबेगाव- शिरूर चमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी येथे केली
पदे येतात आणि जातात, मला पदांचे अप्रूप कधी वाटले नाही. तुमच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रय▪करायचे आहे. जो जीवनात बदल घडवतो, जीवनमान सुधारतो तोच विकास, हीच माझी भूमिका आहे, आज पारगाव परिसरातील सगळ्या वाड्या-वस्त्यांवर लोकांमध्ये उत्साह दिसला. त्यामुळे मताधिक्याची खात्री वाटते ,
वळसे पाटील यांनी शनिवारी पारगाव, लबडे वस्ती, चिचगाई, दातखिळे वस्ती, माळी मळा आदी भागांतील ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पंचायत समितीच्या सभापती जयश्रीताई डोके, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, पारगावच्या सरपंच प्रज्ञा कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दौलतराव लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले,राजकारण कमी करायचे, समाजकारण जास्त करायचे, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. खरे तर आंबेगाव तालुक्यात विकासाची चर्चाच आम्ही सुरू केली. त्यातून भविष्यात पारगाव एक मोठे व्यापारी केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच भीमाशंकर कारखान्याच्या परिसरात एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेसारखी शिक्षणसंस्था सुरू करणार आहेविरोधकांच्या राजकारणावर टीका करताना वळसे पाटील म्हणाले, सत्तेवर येण्याआधीच विरोधकांपैकी कोणी म्हणते मी मुख्यमंत्री होणार, कोणी म्हणते मी गृहमंत्री होणार. हे म्हणजे म्हैस पाण्यात आणि मोहोर चालू असा प्रकार आहे.
यावेळी प्रज्ञा कुलकर्णी, सुभाष बबन ढोबळे, अचर्ना वाळुंज, दौलतराव लोखंडे, संतराम ढोबळे गुरूजी यांनीही मनोगत व्यक्त केले