मुंबई- देशात अच्छे दिन एवजी बुरे दिन पाहावे लागत असताना – महागाई त जनता होरपळत असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून राजकारण्यांचे डावपेच पद्धतशीर पडत असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात जातीय आणि धार्मिक कुरघोड्या करण्याच्या प्रकारांना उत येवू लागला आहे . भाजप शिवसेनेच्या सत्ताकार्यकाळात एम आय एम ची पुर्वाश्रमीच्या शिवसेना स्टाइलने होणारी वाटचाल अचंबित करणारी ठरते आहे . शिवसेनेने दिलेल्या संभाजीनगर या ओउरनगबाद च्या नावाला विरोध करणाऱ्या एमआयएमनं आता …
अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासह शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकांना विरोध केला आहे . हा विरोध एम आय एम ने करणे म्हणजेच जातीय आणि धार्मिक चिथावणी देणे आहे अगोदर एम आय एम ने मुस्लिम स्मारके हटवायला हवी होती आणि मग यावर बोलायला हवे होते . असे सांगत राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जनतेच्या पैशातून स्मारकं उभारण्यापेक्षा त्या जागांवर हॉस्पिटल, शाळा उभारा अशी सूचना पुण्यातील पूर्वाश्रमीचे एका दूरचित्रवाहिनेचे बातमीदारआणि सध्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.एम आय एम ने उघड उघड अशा प्रकारे चिथावण्या देणे हा प्रकार शिवसेना आणि भाजप सरकारच्या काळातील अजबच प्रकार मानला जातो आहे .
औरंगाबादेत दूध डेअरीच्या दोन एकर जागेवर दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. तसंच, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठीही महापौर बंगल्याजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध होताच, औरंगाबादमधील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंडेंच्या स्मारकावर निशाणा साधत ‘स्मारक संस्कृती’लाच विरोध केला आहे.
जनतेचे पैसे वापरून सरकारी जमिनीवर कुठल्याही नेत्याचं स्मारक उभारण्यास एमआयएमचा विरोध आहे. भाजप नेत्यांनी, विधानसभाध्यक्षांनी एकदा घाटी हॉस्पिटल किंवा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघावं. तिथे एमआरआय करण्यासाठी दीड-दोन महिने लागतात. हे चित्र दुर्दैवी आहे. त्यामुळे स्मारकासाठी जागा आणि पैसे खर्च करण्यापेक्षा हॉस्पिटल, शाळा उभारून त्याला नेत्यांची नावं द्यावीत, असं मत त्यांनी मांडलं. १९०० कोटी रुपये खर्च करून अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही आपला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारला ही सूचना मान्य नसेल, तर जनतेच्या हितासाठी आम्ही कोर्टात दाद मागू, असा पवित्राही त्यांनी जाहीर केला.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादेत दूध डेअरीच्या नियोजित जागेवरच होईल, हॉस्पिटलसाठी सरकार पर्यायी जागा देईल, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
जलील यांच्या मागणीस शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदविला. थोर पुरुषांची स्मारके उभारणे ही समाजाची भावना आहे, महापुरुषांची स्मारके निर्माण करायची नाही तर मग काय अफझलखानचे थडगे उभारायचे, असा सवाल शिवसेनेच्या गोऱ्हे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केला.
‘एमआयएमतर्फे समाजात भावना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. हॉस्पिटल की स्मारक असा प्रश्न उपस्थित करून, एमआयएम हे धर्मनिरपेक्ष नागरिकांना संभ्रमात टाकून त्यांची दिशाभूल करत आहे. मुंडे, बाळासाहेब आणि शिवस्मारकाला विरोध करून, एमआयएम कट्टर मुस्लिम आपल्यासोबत राहावे यासाठी धडपडत आहे,’ असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. ‘देशात पुरेशी रुग्णालयं नाहीत हे मान्य आहे. प्रगत देशातसुद्धा रुग्णालयाची कमतरता आहे, प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचता येत नाही. आज भारतात मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा आहे. रुग्णालयांना प्राधान्य आहेच, पण भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी महापुरुषांची स्मारकेही आवश्यक आहेत,’ असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एमआयएमच्या सूचनेला विरोध केला आहे. महापुरुषांची स्मारकं पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी असतात. देश आणि राज्य घडवण्यात ज्यांनी योगदान दिलं त्यांची स्मारकं सरकारी जमिनीवर का उभारू नयेत, असा प्रतिप्रश्न त्यांनी जलील यांना केला आहे. सगळ्याच नेत्यांचा आक्रमक पवित्रा पाहता हा वाद येत्या काळाच चिघळण्याची शक्यता आहे.