गोखलेनगरमधील पूरग्रस्तांना मालकी हक्काची घरे शासनाने दिली. मात्र, या घरांभोवती असलेली वाढीव बांधकामांचा प्रश्न प्रलंबित आहे. ही वाढीव बांधकामेही नियमित करून देऊ. तसेच शासनाने म्हाडासाठी सध्या अडीच एफएसआय दिलेला आहे. आपण तीन एफएसआय मिळण्यासाठी प्रयत्न करीत आलेलो आहे. आणि त्याचा इथून पुढेही पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार काँग्रेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी बोलून दाखविला. याबरोबरच कस्तुरबा गांधी वसाहत, इंदिरा वसाहतीतील नागरीकांना त्यांच्या सध्याच्या घराच्या जागेवरच दुमजली घरे शासनातर्फे बांधून देऊ, असेही निम्हण यांनी सांगितले.
निम्हण म्हणाले, गोखलेनगरमधील पूरग‘स्तांना शासनाने मालकी हक्काची घरे दिली. परंतु, या घराभोवतीच वाढीव बांधकामेही झाली. ती पाडून टाकण्याला आपला विरोध असून अशी बांधकामे नियमित करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. तसेच म्हाडाच्या घरांसाठी तीन एफएसआय मिळविण्यासाठीही प्रयत्न करु. सुशिक्षित युवा वर्गाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठीही कसोशिने प्रयत्न करणार आहे. जेणेकरून कुणी बेरोजगार राहणार नाही. तसेच आरोग्याच्या समस्या, स्वच्छता, वीज, पाणी या स्थानिक समस्या सोडविण्यासाठीही प्राधान्य देणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आजपर्यंत निवडून येऊन अनेकांनी पदे मिळविली. मान, सन्मान मिळवला. मात्र, तेच लोक आज केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी काँग्रेस पक्षाशी गद्दारी करीत आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही, असे खडे बोलही आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना निम्हण यांनी सुनावले. निम्हण यांचा जोरदार प्रचार सुरु असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. रविवारी सकाळी त्यांनी गोखलेनगर परिसर पिंजून काढला. पदयात्रेनंतर झालेल्या छोटेखानी सभेत ते बोलत होते. यावेळी हजारो युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. एस. के. कुसाळकर शेठ यांच्या अर्धाकृती पुतळ्यापासून महिलांनी औंक्षण करून पदयात्रेस प्रारंभ झाला. ही पदयात्रा गोलघर, लाल चाळ, पीएमसी कॉलनी, जनवाडी, जनता वसाहत, निलज्योती, पाचपांडव सोसायटी, वैदवाडी आदी भागातून मार्गस्थ झाली.
नगरसेवक मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक विनोद ओरसे, मनोहर नांदे, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष उमेश वाघ, शिरीष धोत्रे, प्रविण डोंगरे, सनद शेख आदी उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी कस्तुरबा वसाहत येथे भव्य पदयात्रा काढून निम्हण यांनी मतदारांना मत देण्याचे आवाहन करतानाच सांगितले की, कस्तुरबा गांधी वसाहत व इंदिरा गांधी वसाहतीतील नागरीकांना ते सध्या राहत असलेल्या घरांच्या जागेवरच शासनाकडून दुमजली घरे बांधून देऊ. एसआरए ही बिल्डरांच्या फायद्याची स्किम आहे. त्यामुळे नागरीकांनी बिल्डरांच्या पैशाला तसेच दबावाला बळी पडू नका. आपली घरे कदापिही बिल्डरांच्या घशात जाऊ देऊ नका, असे आवाहनही नागरीकांना केले. याबरोबरच आपण केलेल्या कामाच्या माध्यमातून मी आपल्याला मत मागत आहे. तुमच्या आजपर्यंतच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच तुमची मान शरमेने खाली जाईल, असे कोणतेही काम मी आजपर्यंत केले नाही, इथून पुढेही करणार नाही. त्यामुळे काँग्रेसलाच मतदान करण्याचे आवाहनही निम्हण यांनी मतदारांना केले.
शनिवारी सायंकाळी कस्तुरबा वसाहत येथे भव्य पदयात्रा काढून निम्हण यांनी मिळाला. पदयात्रेत हजारो पुरुष व महिला कार्यकर्त्यांसह नगरसेविका शशीकला गायकवाड, सचिन खंदारे, अक्षय मकासरे, विजय चौधरी, दिनेश चौधरी, अक्षय अडागळे, गणेश शिंदे, अमर गायकवाड, सुनंदा मकासरे, शारदा पुनावळे, धनंजय बिराजदार, विलास निम्हण, तात्या नलावडे, संजय तारडे, सुभद्रा कुंभार, प्रमोद कांबळे, अलका गडशी, नीना खंडाळे, संगीता घोगरे, सुधीर जोगदंड, दीपक धस आदी उपस्थित होते.