नवी दिल्ली-. दिल्ली विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरणात चांगलेच तापले असून ‘भाजप’पेक्षा ‘आप’ला जास्त जागा मिळण्याची शक्यता अनेक सर्व्हेतून व्यक्त करण्यात आल्याने पक्षाचे धाबे दणाणले आहे.दरम्यान
दिल्लीतील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव असेल का? या प्रश्नावर शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले की, जय-पराजय नेहमीच कर्णधाराची होत असते.शत्रुघ्न यांनी यावेळी मोदींबरोबर केजरीवाल यांची हि स्तुती केल्याने सारेच बुचकळ्यात पडले आहेत
‘आमचे नेते नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड आहे. ते देशातील जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिक आहेत. ते डॅशिंग आहेत, दृष्टे नेते आहेत, त्यांचे दबंग व्यक्तिमत्व आहेत, चारही दिशांना त्यांचाच डंका आहे. आता ते प्रचारासाठी उतरले म्हणजे सगळ्यांचे लक्ष निश्चित त्यांच्याचकडे जाणार.इतकेच नाही तर त्यांनी ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची स्तुती देखील केली. केजरीवाल यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे, टीव्हीवर देखील ते पाहायला मिळतात. त्यांनी निवडणुकीच्या वातावरणात रंगत आणली आहे.
निगेटिव्ह पॉलिटिक्सवरून देखील त्यांनी आपल्याच पक्षाला लक्ष केले. बेकायदा फंड जमवल्याचा आरोप करणे हा नकारात्मक प्रचार असून ते पक्षाला शोभत नाही. आमचा विरोधी हा काही आमचा शत्रू नाही. त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो, असे म्हणत पक्षाच्या कामकाजालाही लक्ष केले.