मुंबई : ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात, जर कोणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घेवू ‘ असे म्हणतभाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पुरंदरे विरोधकांना सज्जड दम दिला आहे ते म्हणाले , सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केला, तर भाजपा त्याला शिंगावर घेईल, असा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिला.तसंच महाराष्ट्रविरोधी कट रचणारा आणि महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेता कोण, हे शोधून काढून सरकारने फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही शेलार यांनी केली.”पुरस्काराचा सन्मान कमी होण्याची भूमिका मांडणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्र द्रोह करत आहेत”, असं टीकास्त्र आशिष शेलार यांनी सोडलं आहे.