पुणे : ऐतिहासिक पार्श्वभूमी असणार्या व बारा बलुतेदारांच्या कसबा मतदार संघावर कायमच अन्याय झाला असून, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी कसब्याचा विकास खुंटला आहे, अशी कडवी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनी केली. प्रचार फेरीदरम्यान स्थानिक व्यापारी वर्गाकडून दीपक मानकर यांना चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती रसिक धारीवाल यांची कन्या जान्हवी धारीवाल यांनी मानकर यांचे औक्षण करून त्यांना निवडणुकीकरीता शुभेच्छा दिल्या.
गेले अनेक वर्षे प्रस्थापितांनी कसब्याचा विकास केला नसून, जुन्या वाड्यांना एफएसआय देणे असो वा वाहतुकीचा प्रश्न असो ते अद्याप कायम आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अजुनही बसविण्यात आलेले नाहीत. शनिवारवाडा, महात्मा फुले वाड्याच्या आजुबाजूचा परिसराचा विकास अजुनही झालेला नाही. १९८७ च्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अजुनही कायम आहे. मंडईतील अनेक व्यापार्यांचा, पुलावरील बुरुड समाजाचे पुनर्वसन किंवा गंज पेठेतील भोई समाज, चांभार गल्लीतील चटई कामगारांच्या स्टॉलचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. घोरपडी पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गंज पेठ येथील भांडी व्यापार्यांचे स्थलांतराच्या प्रश्नांना आश्वासनापलीकडे काहीच पदरात पडले नसून, त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. मतदार संघातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीतही अत्यंत दुर्लक्षीत दृष्टीकोन दिसून येत आहेत. यामुळेच कसबा मतदारसंघ हा म्हणावा तसा विकसित झालेला नाही.
पुण्यातील या सर्वांत जुन्या व ऐतिहासिक मतदार संघात नियोजनपूर्वक काम केल्यास पुण्याचा ऐतिहासिक वारसा जपत त्याला आधुनिकतेची झळाळी आणता येणे सहज शक्य आहे. मात्र, गरज आहे ती बदलाची. मतदार संघाच्या फेर रचनेत मुस्लिम समाज मोठय़ा प्रमाणावर या मतदार संघात आले आहेत.
मात्र, त्यांचा विकास अजुनही योग्य पद्धतीने झालेला नाही. जो प्रश्न येथील नागरिकांचा तोच प्रश्न येथील झोपडपट्टय़ांचा. मतदार संघातील असलेल्या पाचही झोपडपट्टय़ांच्यापुनर्वसनाच्या प्रश्नांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन या मतदार संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, माझा प्रय▪प्राधान्याने या दृष्टीने असणार आहे.
प्रचारफेरी दरम्यान दीपक मानकर यांना मतदार संघात लक्षणीय प्रतिसाद लाभला. दीपक मानकर यांच्या प्रचार फेरीचे आयोजन त्रिशुंड्या गणपतीपासून ते नानापेठ येथील बारेनिवासपर्यंत करण्यात आले होते. या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राजेश सोनवणे, राजेंद्र जाधव, प्रकाश लांडगे, रवी कावणेकर, सोहम हंबीर, प्रशांत सोनवणे, जीवन मोकाशी, हिमांशु कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.