पुणे- १२० माणसांच्या मृत्यूचे सिलेब्रेशन करणारे हे सरकार असून या सरकारला नोटाबंदीचा हिशेब जनतेला द्यावाच लागेल असे आज येथे सामाजीक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी सांगितले तर या सरकारने नोटा बंदीच्या माध्यमातून जनतेची फसवणूक केली आहे .असा आरोप अजित अभ्यंकर यांनी केला आहे .
केंद्र सरकारने जुन्या 1000 व 500 रुपयांच्या नोटारद्दबातल करण्याच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यातील लक्ष्मीरोडवर नागरिकांनी मानवी साखळी केली. यावेळी नोटबंदीच्या निर्णयाच निषेध करताना मोदी सरकार जवाब दो, अमित शहा जवाब दो असे नारे देण्यात आले.
या साखळीत डॉ. विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे, संदीप बर्वे, अजित अभ्यंकर ,आपचे सुभाष वारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश पांडे, चंद्रकांत वानखेडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटबंदीला आज एक वर्षे पूर्ण होत आहे. नोटबंदी जाहीर केल्यानंतर सामान्य जनतेला अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागले होते. या काळात रांगेत उभे असताना 120 जणांचा मृत्यू झाला. शेतक-यांना त्यांचा माल कवडीमोल भावाने विकावा लागला, या सर्वाचा निषेध करत नोटबंदीनंतर किती पैसा जमा झाला त्याचा नागरिकांना किती फायदा झाला. किती काळा पैसा उघडकीस आला या विषयी नारे देऊन जवाब मागण्यात आला.याविषयी डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सांगितले की, शेतक-यांना 3200 रुपये क्विंटलचा सोयाबीन 1400 रुपयांनी घ्यावा लागला. रांगेत उभे राहिलेल्या 120 नागरिकांचा मृत्यू झाला. हातावर पोट भरणा-या मजूरांच्या कुटुंबांना 3 ते 4 दिवस उपाशी जगावे लागले. या सर्व गोष्टींचा मोदी सरकारला जवाब द्यावा लागेल.