तुळजापूर -येथे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाण पत्र मिळावे तसेच चौंडी च्या निरापधारावरील गुन्हे मागे घेण्यात यावे आणि धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मदत देऊन कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी याकरिता धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने भाजप सरकार चले जाव अशी तुळजापूर ते चौंडी पदयात्रा काल काढण्यात आली.
तुळजापूर मधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून धनगरांच्या 1000 मेंढ्या कळपा सह मोर्चा निघाला .तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या परिसरात जाऊन तेथे भाजप सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ घालून येळकोट येळकोट जय मल्हार, धनगराचे पोरग काय म्हणत आरक्षण देता की घरी जाता,तसेच भाजप सरकार चले जाव च्या घोषणा देण्यात आल्या.