आठ मे पर्यंत उष्णतेची लाट
पुणे– राज्यात बुधवारपासून आलेली उष्णतेची लाट शुक्रवारी आणखी तीव्र झाली. कोकण वगळता राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत शुक्रवारी पारा ४० अंशांवर राहिला. गेल्या तीन दिवसांपासून जगातील हॉटस्पॉट बनलेल्या अकोल्यात शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी देशातील १० सर्वात उष्ण शहरांत महाराष्ट्रातील ६ शहरांचा समावेश होता. महाराष्ट्रासह देशांतील विविध राज्यांत येत्या आठ मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे