दृष्टीहीन खेळाडूंच्या भारत विरूध्द श्रीलंका 20-20 मर्यादित षटकांची 8 सामन्यांची मालिका
पुणे,11 ऑक्टोबर 2018 : क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड ऑफ महाराष्ट्र ही संस्था दृष्टिहीन खेळाडूंच्या शालेय स्तरीय क्रिकेट स्पर्धेपासून ते विश्वचषक क्रिकेट स्पर्धेेपर्यंतचे आयोजन वेळोवेळी करत आली असून,ही संस्था क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड इन इंडिया व वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन या संस्थांशी संलग्न आहे. दि.15/10/2018 रोजी पुण्याच्या नेहरू स्टेडियम येथे भारत विरूध्द श्रीलंका यांच्यातील 8 सामान्याच्या मालिकेतील 20-20 स्वरूपातील मर्यादित षटकांचा पहिला सामना खेळवला जाणार असून,दुसरा सामना दि.16/10/2018 रोजी मुंबई येथील इस्लाम जिमखाना मरीन लाईन येथे खेळवला जाणार आहे.या 8 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने हे महाराष्ट्रात खेळवले जाणार असल्यामुळे,या दोन्ही शहरांमध्ये दृष्टीहीन क्रिकेट सामने पाहण्याबाबत जनसामान्यांमध्ये मोठी उत्सुकता असून,पुण्यातील सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट हे आयसीसी केबल नेटवर्क यांच्याकडून विनामुल्य केले जाणार आहे.तसेच ब्लाईंड क्रिकेट इन इंडिया भारत श्रीलंका 2018 या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून सर्व लोकांना हे सामने पाहता येणार आहेत.या सर्व सामन्यांसाठी भारतीय संघामध्ये महाराष्ट्राचे एकूण 3 खेळाडू खेळणार असून,त्यामध्ये पुणे-बारामती-अमोल करचे,परतवाडा अमरावती-अनिल बेलसरे,कातली वर्धा-प्रविण करलुके अशा 3 खेळाडूंचा समावेश संघामध्ये आहे.या मालिकेचा अंतिम सामना हा कलकत्ता येथे दि.27/10/2018 रोजी खेळवला जाणार आहे.
दृष्टीहीन क्रिकेट खेळ हा प्रामुख्याने आवाजावर खेळला जात असून या खेळासाठी वापरला जाणारा चेंडू हा कठिण प्लॅस्टिकचा असतो,त्यामध्ये आवाजासाठी सायकलमध्ये वापरले जाणारे बॉल बेरींग/छर्रे वापरून हा चेंडू बनविला जातो.हा चेंडू खेळताना सरपटी/अंडरआर्म पध्दतीने फलंदाजाकडे टाकला जात असून,यासाठी आवश्यक आलेली खेळपट्टी ही सर्वसामान्य क्रिकेटसाठी वापरल्या जाणार्या खेळपट्टीप्रमाणेच तिचा वापर या खेळासाठी केला जातो.हा खेळ खेळण्यासाठी सर्वसामान्य नियमांमधील काही नियमांमध्ये बदल करून हा खेळ खेळवला जातो.क्रिकेटच्या या खेळामधील खेळाडूंची विभागणी 3 पध्दतींमध्ये केली जाते.बी-1 कॅटेगरी-एकूण 4 खेळाडू 100 टक्के अंध,बी-2 अंशत: दृष्टीहीन 2.60 इतक्या अंतरावरील नजर असणे आवश्यक -एकूण 3 खेळाडू आणि बी-3 कॅटेगरी- एकूण 4 खेळाडू अल्पदृष्टी-(3.60 मीटर इतक्या अंतरापर्यंतची नजर आवश्यक) अशा पध्दतीने मैदानावर एकूण 11 खेळाडू हा क्रिकेटचा खेळ खेळत असून संघांमध्ये प्रत्येक कॅटेगरीमधील एक-एक खेळाडू हा अतिरिक्त खेळाडू म्हणून असून 14 खेळाडू व 1 कोच व 1 मॅनेजर असा एकूण 16 जणांचा संघ केला जातो.
क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड ऑफ महाराष्ट्र ही संस्था मागील दहा वर्षांपासून प्रामुख्याने महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी विशेषत: काम करीत असून,संस्था सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय व विश्वचषक या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या एकूण 7 खेळाडूंचा समावेश या भारतीय संघामध्ये झाला असून यापुढेही दृष्टीहीन क्रिकेटचा दर्जा वाढवून भारतीय संघामध्ये महाराष्ट्राच्या अधिकाधिक खेळाडूंचा समावेश होण्यासाठी ही संस्था खेळाडूची अधिक तयारी करून जास्तीत जास्त खेळाडूंचा समावेश होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेणार आहे.तसेच या स्पर्धेसाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क व रूद्राक्ष इव्हेंटचे प्रायोजकत्व,सहकार्य लाभत असून या चॅनेलच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळत असल्यामुळे संस्थेस सदर स्पर्धा घेण्यास मदत होत आहे.हा आठ सामन्यांची मालिका ही क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड इन इंडिया व वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने खेळवली जाणार आहे.
या सर्व ठिकाणी होणार्या या सामन्याचे उद्घाटन दि,.15/10/2018 रोजी नेहरू स्टेडियम पुणे येथे श्री सुनंदन लेले,वरिष्ठ क्रीडा समीक्षक यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक,अभिनेते,पटकथा लेखक प्रवीण तरडे व सिनेकलाकार सुरेश विश्वकर्मा,मिस्टर वर्ल्ड महेंद्र चव्हाण व उद्योगपती व सामाजिक नेते विठ्ठलशेठ मणियार हे उपस्थित राहणार आहेत.तसेच पारितोषिक वितरण समारंभ हा दि.15/10/2018 रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्राचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ व महाराष्ट्राचे माजी कर्णधार शंतनू सुगवेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.