नवी दिल्ली- राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याऐवजी अजूनच गुंतत चालला आहे. भाजप नंतर शिवसेनेलाही सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना तीन सत्ता स्थापनेस 24 तास पुरेसे नसल्याने तीन दिवसांचा कालावधी मागितला, पण त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर आता राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचे सांगण्यात येते आहे..
शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सेनेने आज(मंगळवार) तातडीच्या सुनावणीची विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे. पण, न्यायालयाकडून त्यांना अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाहीये. तसेच, राज्यात राष्ट्रपती राजवट लागून झाल्यानंतरही शिवसेना उच्च न्यायालयात निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काल सत्ता स्थापनेस अपयशी झालेल्या शिवसेनेने राज्यपालांच्या वेळ वाढवून न देण्याच्या निर्णयाला असंवैधानिक म्हटले.