नाशिक -पैसे दिले तर घ्या पण यांच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्या,यंदाची निवडणूक ह्या देशात लोकशाही टिकणार आणि हुकूमशाही येणार हे ठरवणारी निवडणूक आहे हे विसरू नका. देश संकटात आहे म्हणून मी प्रचार करतोय असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले
राज ठाकरे म्हणाले ,’एचएल या कंपनीची क्षमता असतानाही फक्त मैत्री जपण्यासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलसंदर्भातलं कंत्राट देण्यात आलं असाही आरोप राज ठाकरेंनी केला. तसंच एचएएल आणि जेट या कंपन्या डबघाईला आणण्याचं काम या सरकारने केलं. याच सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव देऊ असं आश्वासन दिलं होतं, बेरोजगारी हटवण्यात येईल. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, काळा पैसा भारतात आणू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू ही आणि अशी अनेक स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवली होती. मात्र यातलं एकही स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं नाही. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी काय आश्वासनं दिली होती? आणि अमित शाह म्हटले होते की पंधरा लाख रूपये हा जुमला आहे ती क्लिपही या भाषणात राज ठाकरेंनी दाखवली. देशाला मूर्ख बनवण्याचं काम अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गांधी परिवारातल्या सदस्यांनी भ्रष्टाचार केला. रॉबर्ट वढेराला तुरूंगात टाकण्याची भाषा भाजपाच्या नेत्यांनी २०१४ च्या आधी केली होती. आता मात्र या कोणत्याही गोष्टींचा उल्लेखही मोदी करत नाहीत. रॉबर्ट वढेरा यांच्या अटकेबाबत अमित शाह यांनी काय म्हटलं होतं त्याचीही क्लिप राज ठाकरेंनी दाखवली आणि देशाला हे लोक कसे मूर्ख बनवतात ते पहा असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं.
काँग्रेसच्या काळात टू जी घोटाळा प्रकरणी ए राजा, कनिमोळी यांच्यासह अनेकांना तुरुंगात धाडलं होतं. ते सगळे भाजपाच्या काळात कसे सुटले ? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावर टीका होते असे वक्तव्य नरेंद्र मोदींनी केली होती. तुम्ही हे काय बोलत आहात? प्रश्न विचारल्यावर तुम्हाला जात आठवते का? असेही प्रश्न राज ठाकरेंनी विचारले. सगळी खोटी आश्वासनं देणाऱ्या आणि खोटं बोलणाऱ्या मोदींना कोणत्या निकषांवर मतं द्यायची? असा प्रश्न राज ठाकरेंनी पुन्हा एकदा विचारला.
आणखी काय म्हणाले राज ठाकरे –
१९३२ साली जे हिटलर ने केले.. तेच या देशात चालू आहे, न्यायालय , माध्यमे, तपास यंत्रणा साऱ्यांना दबावाखाली ठेवण्यात येते आहे…
कॉंग्रेस च्या काळात २ जी ..वगैरे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून .ज्यांना तुरुंगात घातले ते भाजपच्या काळात बाहेर सुटले …
मला ५० दिवस द्या ,नोटबंदी..अयशस्वी वाटली तर पाहिजे त्या चौकात मला पाहिजे ती शिक्षा द्या म्हणाले होते .. आता चौक सांगा .. सुप्रीम कोर्टाचे निष्णांत वकील कपिल सिब्बल यांनी घेतलेली पत्रकार परिषद मिडिया ने प्रसिद्धीस दिलीच नाही ..कपिल सिब्बल यांनी नोट बंदी बाबत गौप्यस्फोट करणारी माहिती दिली . ती खोटी असेल तर त्याबाबत त्यांच्यावर भाजपने कारवाई का केली नाही ?
हि निवडणूक लोकशाही राहणार कि हुकुमशाही येणार याचा फैसला करणारी आहे …मी देशावर आलेले संकट दूर करण्यासाठी प्रचार करतोय ..माझी हाथ जोडून विनंती आहे पुन्हा फासले जावू नका ..