पुणे- पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणुकदारांसाठी सुरु असलेल्या खासदाराच्या घराबाहेर आंदोलन या संकल्पनेलाच विरोध करीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आंदोलकांना झिडकारून लावले आणि अशी आंदोलने होता कामा नये याबाबत पोलीस आयुक्तांना आदेश देतो असे सांगून त्यांनी आंदोलकांचा अवमान केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे .तर दुसरीकडे मात्र खासदार अनिल शिरोळे आणि सध्या भाजपवासी झालेले खासदार संजय काकडे यांनी मात्र आंदोलकांशी चर्चा करून प्रश्न समजावून घेत याबाबत अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा सुरु केल्याचे दाखवून दिले आहे .शहरात विविध प्रश्नांना आता विविध स्तरावरून अशा जातीय वर्तुणूकीतून पाहिले जाऊ लागल्याचे गंभीर चित्र दिसून येवू लागले आहे .
राष्ट्रशक्तीचे माऊली दारवटकर यांनी जावडेकरांनी दिलेली वागणूक चव्हाट्यावर मांडली आहे . याबाबत मंत्री जावडेकर यांच्याशी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही .दरम्यान या प्रकरणी राष्ट्रशक्तीचे माऊली दारवटकर यांनी म्हटले आहे कि,पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणुकदारांचा आक्रोश पुण्यातील सर्व खासदारांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलनाने मांडण्यात आला …खासदार वंदना चव्हाण,खा.अनिल शिरोळे,खा.संजय काकडे यांनी गुंतवणुकदारांशी चर्चा करून त्यांना दिलासा दिला.या ऊपरोक्त खा.संजय काकडे यांनी या पुर्वी दिलेल्या पहिल्या निवेदना नंतर लगेचच अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे पत्र दिले..तर अर्थमंत्री अरूण जेठली यांचा पुण्यातला दौरा असल्याने निवेदन मिळाल्यावर लगेचच दुपारी खा. शिरोळे यांनी त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून लवकर तोडगा काढण्याची विनंती केली..तर खा.सुप्रीयाताई सुळे यांनी या पुर्वीच या विषयाचा पाठपुरावा सुरू केला आहे..मात्र मणुष्यबळ विकासमंत्रीपद बक्षिस म्हणुन मिळालेल्या खा.जावडेकर यांनी मात्र..आंदोलकांना निराश केले… या संघसेवकाने अशी आंदोलने थांबवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना देतो असे उद्दाम पणे सांगीतले…विशेष म्हणजे त्यांना या आंदोलनाची पुर्वसुचना दिलेली असतानाही मला माहीतीच नाही अशी भुमीका त्यांनी घेतली…त्यावर त्यांना त्यांच्या घरी देण्यात आलेले निवेदनाची पोच दाखवताच त्यांनी “आता घरच्यांनाही अशी निवेदने न स्विकारण्याची सुचना देतो” असे ही सांगीतले..त्या नंतर संतप्त गुंतवणुकदारांनी प्रचंड घोषणा देत जावडेकर यांचा निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केले…माऊली दारवटकर यांनी असे ही म्हटले आहे कि,कदाचित गुरूजी पितृपक्षात अशी निवेदने घेत नसावेत.. आता राज्यातल्या प्रत्येक मेळाव्यात व आंदोलनात गुरूजीचा निषेध करूनच आमची सुरूवात होईल.