मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २५ वर्षापासून आमदार पद भूषवत आहेत. राजकारणात स्वच्छ आणि मजबूत प्रतिमा असलेले मंगल प्रभात लोढा यांनी या नवीन जबाबदारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या संकल्पनेतून पक्षाला अधिक बळकट बनवून पुढे घेऊन जाण्याचे काम करणारा.
महाराष्ट्र विधानसभेचे पाचव्यांदा सदस्य असलेले लोढा १९९५,१९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये मुंबईचा मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून विजय होत आले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० हजार मताधिक्क्याने विजय मिळवत महाराष्ट्रात सर्वधिक मत प्रतिशतांनी विजय मिळविण्याचा कीर्तिमानही त्यांनी रचला होता. १८ डिसेंबर १९५५ जोधपूर विद्यापीठातून बीकॉम एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर ते वकिलीचा पेशामध्ये आले होते. विद्यार्थिदशेपासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गतिविधिशी जोडलेले असून राष्ट्रीय स्वयम सेवक संघटनेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले आहे. विद्यार्थी जीवनात लोढ़ा जोधपुर विश्वविद्यालयाचे महासचिव देखिल होते. त्यांचे वडील सुप्रसिद्ध न्यायमूर्ती गुमानमल लोढा यांनी ३ वेळा खासदार पद भूषवले असून राष्ट्रवाद विचारधारेच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांना राष्ट्रवादाचे संस्कार त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षापासून आमदार लोढ़ा रामभाऊ म्हालगी प्रबोधिनीचे महासचिव आणि प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे.
लोढा यांनी सन १९८७ पासून एकूण ९ लोकसभा निवडणुकीत विविध पदावरील मुख्य जबाबदारी भूषवली असून एक यशस्वी रणानितीकार म्हणून त्यांची छबी निर्माण झालेली आहे. विद्यार्थिदशेत त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही सक्रिय भूमिका बजावली होती. ते सन १९८१ मुंबईला आले कंस्ट्रक्शन व्यवसाय स्थापित करून त्यांनी हा व्यवसाय आपल्या मुलांना सोपवला असून ते आता पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असून समाज कार्य करत आहेत. ते म्हणाले की, देशाच्या सर्वात मोठ्या महानगराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी जी त्यांना सोपवण्यात आली आहे, ही जिम्मेदारी ते सर्वांच्या सहकार्याने परी पूर्णपणे पार पाडणार.