भाजप मुंबई अध्यक्ष बनताच लोढा यांचा बांगलादेशी आणि बनावट मतदारांना इशारा
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष पदाचे पदभार सांभाळतात मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमध्ये राहत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांच्या आणि बनावटी मतदारांच्या विरोधात मोहीम छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. लोढा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अध्यक्षपदाचा पदभार सांभाळताच त्यांचं पुढचं पाऊल हे बांगलादेशी घुसखोर आणि आजमगड आदी परिसरातून आलेल्या बनावटी मतदारांच्या विरोधात असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, हे नाही चालणार की कोणाचं आजमगड मध्येही मतदार यादीत नाव असेल आणि मुंबईच्या मतदार यादीतही. ते म्हणाले की, असे लाखोंचा संख्यामध्ये घुसखोर आणि बनावटी मतदार आहेत, त्यांना सर्वात आधी भाजप कार्यकर्ता मदान यादीतून डिलीट करतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सहित उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिक्षा मंत्री अशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री योगेश सागर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्यासह अनेक खासदार आणि आमदार हे दादर येथील वसंत स्मृती येथे आयोजित नवसंकल्प समारंभात भाजपचे वरिष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा यांनी भाजप मुंबई अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. भाजपचे वरिष्ठ आमदार लोढा हे अशिष शेलार यांच्या जागी मुंबई भाजपचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. लोढा यांनी पदभार सांभाळताच आपल्या पहिल्या भाषणात स्पष्टपणे सांगितलं आहे की, काही राष्ट्रविरोधी घटक भारताच्या सार्वभौमत्वाला नुकसान पोचवत आहे. त्यांना सहन केलं जाणार नाही. लोढा यांनी मुंबई भाजप अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. याप्रसंगी ते म्हणाले की, त्यांना या गोष्टीचा गर्व आहे की देशातील सर्वात मोठ्या महानगराची जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाली. ते म्हणाले की, आम्ही सर्वांच्या सहकार्याने मुंबईमधील सर्व ३६ जागांवर काँग्रेसचा सफाया करू.
नवसंकल्प समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्याप्रकारे मागील काही निवडणुकांमध्ये मुंबईने भाजपला अधिकाधिक मतदान केले आहे, हा प्रधानमंत्री यांचा चमत्कार असून या बदल्यात पंतप्रधान यांनी मुंबईला बरच काही दिलं आहे. जे मागील कोणत्याही सरकारने दिले नाही. ते म्हणाले की, मागील सरकार मुंबईला सोन्याचे अंड देणारी कोंबडी समजत होती. परंतु मोदीजी यांच्याद्वारे पाठवण्यात आलेल्या आर्थिक सहकार्यामुळे आम्ही ३० पेक्षा अधिक विकासकार्यांना सुरुवात केलेली आहे. जे मागील सरकारने केलेले नव्हते. आमदार लोढा यांची संघटन क्षमता, निवडणूक रणनितीची ताकद आणि प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी आमदार लोढा यांच्या प्रती विश्वास व्यक्त करत, येत्या ऑक्टोंबरमध्ये होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईची जनता काँग्रेसचा सफाया करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. कारण मुंबईमध्ये विकासाचे गुणात्मक परिवर्तनाचे जे काम झाले आहे, ते आमच्या सरकारने केले आहेत.
मुंबई भाजप अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळण्याचा या समारंभात प्रदेश भाजपचे संघटन महासचिव विजयराव पुराणिक आणि मुंबई भाजप संघटनेचे महासचिव सुनील कर्जतकर सहित मुंबईचे सर्व आमदार, नगरसेवक तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्यासह दोन हजारपेक्षाही अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई भाजप कार्यालयमध्ये मागील अनेक वर्षांनंतर लोढा यांच्या पदभार सांभाळण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.