पुणे-गुजरात आणि बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही संपूर्ण दारूबंदी करावी अशी राज्य सरकारकडे मागणी आणि विनंती करणारा ठराव आज महापालिकेच्या मुख्य सभेत एकमताने संमत करण्यात आला.
उपमहापौर सिद्धार्थ धेंडे आणि सुनिता वाडेकर यांनी हा ठराव 3 एप्रिल रोजी सादर केला होता . सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटर लगतच्या परिसरात दारूबंदी ची अंमलबजावणी केल्याने याबाबत शासनाचे अभिनंदन याच ठरावात करण्यात आले आहे . जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवाला नुसार दारूसेवनाच्या दुष्परिणामांमुळे प्रत्येक दिवसाला १५ जणांचा मृत्यू होतो यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक त्यानंतर मध्य प्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो .दारूच्या दुष्परिणामामुळे राज्याचे आणि देशाचे न भरून येणारे नकसान होत आहे .या बाबींचा विचार करून राज्यात दारूबंदी लागू करावी आणि आणि नागरिकांचे हीत जोपासावे अशी शिफारस या ठरावान्वये करण्यात आली आहे .