मुंबई-आपल्या सभोवती सायबर युद्ध सादृश्यस्थिती तिथी असून, हे आपल्या खासगी, बँक अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत आहे. सायबर स्पेस हे एक नवीन युद्धप्रवण क्षेत्र असून आपण एकाही युद्धात हार मानायला नको, नाहीतर आपण सर्व हॅकर्सना बळी पडू. तथापि, आपण सक्षम झाल्यास या युद्धात तग धरू शकू. मोबाईल आणि टॅबलेट ही आपली युद्ध अवजारे असून आपण आपल्या इंटरनेटचे चौकीदार होण्याची गरज आहे.असे प्रतिपादन मुंबईस्थित इस्रायलचे वकिलात याकोव्ह फिनकेलेस्टीन यांनी येथे केले तर इंटरनेट हे सुरक्षेच्या दृष्टीने आकारलेले नसून ते असुरक्षित आणि हॅक होण्यासारखे आहेत. विविध नियम आणि कायदे असले तरी हॅकर्स केव्हाही व्यक्तीगत अकाऊंटस् हॅक करण्यात यशस्वी होऊ शकतात.अशी माहिती टेल ॲव्हीव्ह विद्यापीठाच्या सायबर सुरक्षा केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेनिबारझीले यांनी येथे दिली .
मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात आज सायबर सुरक्षा या विषयावर सार्वजनिक व्याख्यान आणि समूह चर्चा आयोजित करण्यात आली होती. नेहरू सायन्स सेंटर आणि इस्रायलच्या मुंबईस्थित वकिलातीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध शाळांमधले विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन सायबर सुरक्षा हा विषय तज्ञांकडून समजावून घेतला.गेल्या 15 वर्षांमध्ये जागतिक स्तरावर तंत्रज्ञानात कमालीचा बदल झाला असून इंस्टाग्राम, आर्टिफिशियल इंटलिजन्स, इंटरनेट गेम्स, स्वयंचलित कार इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. नवीन तंत्रज्ञान जरी मिळाले तरी त्यामुळे उद्भवणाऱ्या नवीन आव्हानांना सायबर सुरक्षा तज्ञांना तोंड द्यावे लागत असून दररोज नवीन उपाय शोधून काढावे लागत आहेत. यासाठी आपण हे प्रश्न कसे उद्भवणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
इंटरनेट हे सुरक्षेच्या दृष्टीने आकारलेले नसून ते असुरक्षित आणि हॅक होण्यासारखे आहेत. विविध नियम आणि कायदे असले तरी हॅकर्स केव्हाही व्यक्तीगत अकाऊंटस् हॅक करण्यात यशस्वी होऊ शकतात.
विविध देशांमधले तज्ञ एकत्रित येऊन सायबर गुन्हे होत असल्याचे कबूल करीत आहेत. यासाठी आपल्याला विविध देशांतर्फे विशेष तज्ञांची आवश्यकता भासणार आहे. बॉम्बसारख्या सायबर धमक्या आपल्याला त्वरित सुरक्षा उपाय शोधण्यासाठी उद्युक्त करत नाहीत. त्यामुळे आपल्याला याचे गांभीर्य लक्षात येत नाही आणि लोकांना आपण अशा प्रकारचे हॅक झाले असल्याचे समजवू शकत नाही, अशी माहिती टेल ॲव्हीव्ह विद्यापीठाच्या सायबर सुरक्षा केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेनिबारझीले यांनी सांगितले.
बारझीले पुढे म्हणाले की, ‘द इंटरव्ह्यू’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर सोनी कॉर्पोरेशनवर सायबर अटॅक झाला होता. या हल्ल्याला तोंड देण्यास सोनी कॉर्पोरेशन सक्षम नव्हते. अशा वेळी सरकारने खासगी कॉर्पोरेशनच्या वतीने उभे राहायला हवे. इंटरनेट हा अब्जावधी कॉम्प्युटर डिव्हायसेसचा भाग असतो. या सर्व कॉम्प्युटर्सना हॅक होण्याची संभावना जास्त असते. त्यामुळे आपल्या खासगी आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. मोठ्या कंपन्यांमधील बहुतांश डाटा, युझर स्वत:च्या लाभासाठी हॅक करू शकतो. याचा अनुभव अलिकडेच अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आला.
मुंबईस्थित इस्रायलचे वकिलात याकोव्ह फिनकेलेस्टीन म्हणाले की, आपल्या सभोवती सायबर युद्ध सादृश्यस्थिती तिथी असून, हे आपल्या खासगी, बँक अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत आहे. सायबर स्पेस हे एक नवीन युद्धप्रवण क्षेत्र असून आपण एकाही युद्धात हार मानायला नको, नाहीतर आपण सर्व हॅकर्सना बळी पडू. तथापि, आपण सक्षम झाल्यास या युद्धात तग धरू शकू. मोबाईल आणि टॅबलेट ही आपली युद्ध अवजारे असून आपण आपल्या इंटरनेटचे चौकीदार होण्याची गरज आहे.
सायबर बुलिंग उघडकीस आणण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सोनाली पाटणकर यांनी नमूद केले.
महाराष्ट्र सरकारच्या पोलीस विभागाचे उपायुक्त सचिन पांडकर म्हणाले की, सायबर गुन्ह्यांविरुद्ध सरकारने कडक यंत्रणा अवलंबिली असून मुलांना सायबर धमक्या मिळण्यापासून वाचवण्यात येत आहे.
आयआयटी मुंबईचे कॉम्प्युटर विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे डॉ. मनोज प्रभाकरन् यांनी स्पष्ट केले की, व्हॉटसप सारख्या ॲपद्वारे सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढा देता येऊ शकतो. सायबर गुन्हा म्हणजे एकीकडे भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यादरम्यान वाढवण्यात येणारा ताण आहे. तर दुसरीकडे कूटनीती आणि उपयोगकर्त्यांचे अधिकार जपणे आवश्यक आहे.
नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेनेड तसेच मुंबईस्थित इस्रायलच्या उपवकिलात निमरोड कालमार उपस्थित होते.