मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळला.आहे. टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेला हा पूल कोसळला आहे. हा पूल कामा रूग्णालयाजवळचा पूल कोसळला आहे. या घटनेत तर या घटनेत पाचजण दगावले आहेत अशीही माहिती मिळते आहे. ३४ जण जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. संध्याकाळी ७.३० च्या सुमारास हा पूल कोसळला आहे. ऐन गर्दी असताना, लोक घरी जाण्याच्या वेळीच नेमकी ही घटना घडली आहे. मदत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरु करण्यात आलं आहे.
मृतांची नावं-१) अपूर्वा प्रभू (वय ३५);२) रंजना तांबे (वय ४०);३) सिराज खान (वय ३२);४) एक प्रवासी ( नाव समजू शकलेले नाही);५) एक प्रवासी (नाव समजू शकलेले नाही)
सीएसएमटी येथील कोसळलेल्या पादचारी पुलाची जबाबदारी रेल्वे मंत्रालयाने झटकली आहे. हा पूल महापालिकेच्या आखत्यारितील असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. तर दुसरीकडे महापालिकेचे स्थानिक नगरसेवकांनी या दुर्घटनेला रेल्वेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावरुन याची जबाबदारी एकमेकांच्या अंगावर ढकलण्याचा प्रकार सुरु झाला आहे.
पूल १०० टक्के धोकादायक स्थितीत नव्हता : विनोद तावडे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेवर मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा पूल १०० टक्के धोकादायक असल्याचा अहवाल नव्हता. या पुलाची किरकोळ दुरुस्तीची शिफारस करण्यात आली होती. या दुरुस्ती कामांना सुरुवात देखील केली जाणार होती, मात्र दुरुस्ती काम होईपर्यंत पूल बंद ठेवणे अपेक्षित होते का ?, या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची, याची महापालिका आणि रेल्वे प्रशासनाचे संयुक्त पथक चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील अंजूमन इस्लाम शाळेजवळील पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून २९ जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. पालकमंत्री विनोद तावडे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
“संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी हा पूल कोसळला, सिमेंटचा स्लॅब कोसळ्याने जे पादचारी होते ते खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच पाच मिनिटांमध्ये पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, सात मिनिटांमध्ये फायर ब्रिगेड पोहचले आणि बचाव कार्य सुरु झालं, असे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच मी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस दलातील अधिकारी यांच्याशी चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. हा पूल १०० टक्के धोकादायक स्थितीत नव्हता, असा प्राथमिक अहवाल आहे. पुलाच्या किरकोळ दुरूस्तीचा प्रस्ताव होता, दुरुस्ती काम लवकरच सुरु होणार होते. हा पूल कोणी बांधला, त्याची दुरुस्ती कोणाकडे होती याची माहिती घ्यावी लागेल. मुंबई महापालिका आणि रेल्वेतर्फे या घटनेची चौकशी होईल. जखमींचा सगळा खर्च सरकार करणार आहे. या दुर्घटनेची चौकशी महापालिका आणि रेल्वेतर्फे होईल, असे त्यांनी सांगितले.
स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये, पण पुलासाठी पैसे नाहीत : आमदार वारिस पठाण
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारत आणि अंजूमन इस्लाम शाळेजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण पुलासाठी सरकारकडे पैसे नाहीत, लोकांच्या सुरक्षेचे काय ?, असा संतप्त सवाल आमदार वारिस पठाण यांनी विचारला आहे.
गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. यात १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील पादचारी पुलांची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. यावरुन एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयावर टीका केली.
बऱ्याचदा सांगूनही या पुलाचे ऑडिट झालेलं नाही, हजारो लोक इथून दररोज प्रवास करतात, आता या पुलावरुन एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रकार होईल, बीएमसी आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतील, असे वारिस पठाण यांनी सांगितले. सरकारने या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारकडे स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यासाठी पैसे आहेत, पण पुलासाठी पैसे नाही, असे त्यांनी सांगितले.