पुणे-राज्यात रँचो निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री मंत्री विनोद तावडे यांनी केले . नवीन उद्योजकामध्ये नवीन कौशल्य घडविण्यासाठी टिळक रोडवरील स. प. महाविद्यालयातर्फे मेवेन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित केलेल्या या परिषदेस ,शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष ऍड. सोहनलाल जैन , स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ , उपप्राचार्य अशोक मोरवाल , स. प. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुख व मेवेनच्या मुख्य संयोजक डॉ. सरोज हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सांगितले कि , युवकांनी शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण व तांत्रिक कौशल्य आत्मसात केले पाहिजे . त्यासाठी देशाचे आद्योगिक धोरण देखील बदलत आहे . या परिषदेमधून व्यावसायिक निर्माण करण्याची अभिनव कल्पना कौतुकास्पद आहे . मातृभाषेतून शिक्षण घेतले तर ज्ञानग्रहण जास्त होते , त्यामुळे आता इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात शिक्षण घेण्याकडे कल वाढत आहे . जगात मातृभाषेमध्ये शिक्षण चळवळ सुरु झाली आहे . पुढचा पाठ मागचा सपाट हा पॅटर्न बदलला आहे . दहावीमधील नापास विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा देउन आपण त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविले आहे . राज्यात रँचो निर्माण करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष ऍड. सोहनलाल जैन यांनी राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री मंत्री विनोद तावडे यांचे स्म्रुतीचिन्ह देउन स्वागत केले . यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष ऍड. सोहनलाल जैन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .