पुणे : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित दुसर्या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे उद्घाटन आध्यात्मिक गुरू श्री. दलाई लामा यांच्या हस्ते बुधवार, दि. १० जानेवारी २०१८ रोजी, सकाळी १०.०० वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.श्री. विनोद तावडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दि.१० ते १२ जानेवारी २०१८ या दरम्यान एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरुड येथे ही दुसरी नॅशनल टीचर्स काँग्रेस होत आहे. ‘शिक्षकांना प्रेरित करुन सक्षम पिढी घडविणे’ हा या परिषदेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
उद्घाटन समारंभाचे वेळी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल आयआयटीच्या थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक समन्वयक आणि सल्लागार, पद्मश्री प्रा. कस्तुरीलाल चोप्रा, युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर, मुंबईच्या आयआयटीचे माजी सहसंचालक प्रा.एस.सी.सहस्त्रबुध्दे व कानपूरच्या आयआयटीचे माजी संचालक व सुप्रसिध्द शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉ.संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ व विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे, युनेस्को अध्यासन व असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन या संस्थांच्या सहकार्यातून ही अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच होत आहे. देशभरातून व विदेशातून पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे ८,००० शिक्षक यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
उद्घाटन समारंभासाठी महापौर सौ. मुक्ता टिळक, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल डी.सहस्त्रबुध्दे, तिबेट येथील सेंट्रल तिबेटियन अॅडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष डॉ. लोबसांग सांगे व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचा समारोप समारंभ दि. १२ जानेवारी २०१८ रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री. राजेश टोपे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एशियन हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक पद्मभूषण श्री. राजीव सेठी, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डॉ. व्ही.जी.नारायणन, सुप्रसिध्द नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.
भारत सरकारच्या यूपीएससीचे माजी चेअरमन श्री. डी.पी.अग्रवाल यांना यावेळी ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
उद्घाटन व समारोप यासह विविध विषयांवरील चर्चेसाठी सहा सत्रे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये पहिले सत्र बुधवार, दि. १० जानेवारी २०१८ रोजी दुपारी २.३० वाजता ‘भारतातील उच्च शिक्षण : आढावा आणि भावी दिशा’ या विषयावर होणार आहे. यामध्ये डॉ. जय गोरे, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. रघुनाथ शेवगावकर, युनायटेड स्टेट इंडिया एज्युकेशनल फाउंडेशनचे प्रदेश प्रमुख श्री. रायन परेरा, प्रा.डॉ. मकरंद हस्तक, उटाह विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ माइन्स अॅण्ड अर्थ सायन्सेसचे अधिष्ठाता प्रा.डेरियल भट, डॉ.सय्यद कल्बे रशीद रिजवी हे सहभागी होणार आहेत.
दुसरे सत्र गुरूवार, दि. ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या सत्राचा विषय ‘ वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण- विश्व शांतीचा पाया’ असा असेल. यामध्ये उत्तराखंड राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. धन सिंग रावत, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरूण सहानी, प्रा.अनिरुध्द देशपांडे, डॉ. स्कॉट हॅरियट, निवृत्त न्या.एन.संतोष हेगडे, डॉ. के.ई. सीताराम, डॉ.लक्ष्मी सीताराम, जैन संत आचार्य लोकेश मुनी आदी सहभागी होणार आहेत.
तिसरे सत्र गुरुवार, दि. ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११.१५ वाजता होणार आहे. ‘उच्च शिक्षणातील गुणवत्ता- सत्य आणि सामोपचार’ हा या सत्राचा विषय असेल. यामध्ये स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, बंगलोरच्या आयआयएमचे संचालक प्रा.जी. रघुराम, डॉ. जगन्नाथ पाटील, टीआयएसएसचे संचालक प्रा. एस.परशुरामन व हायर एज्युकेशन फोरमचे संस्थापक डॉ.ए.के.सेनगुप्ता मार्गदर्शन करणार आहेत.
चौथे सत्र गुरूवार, दि.११ जानेवारी २०१८ रोजी दुपारी २.००वाजता ‘उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग-फायदे विरूद्ध अडथळे’ या विषयावर होणार आहे. या सत्रात कानपूर येथील आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांडे, नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपति पद्मभूषण डॉ. विजय भटकर,
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, युएसच्या महर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंटचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल माहेश्वरी व यूएस येथील बॉलस्टेट युनिव्हर्सिटीच्या मिलर कॉलेज ऑफ बिझनेसचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुशील शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत.
पाचवे सत्र शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०१८ सकाळी ९.०० वाजता ‘शिक्षकांचे प्रशिक्षण’ या विषयावर होणार्या या सत्रात भारतरत्न डॉ.सी. एन. आर. राव, अॅमिटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.बी.शर्मा, प्रा. मायकेल जेन्सन, श्री. मनिष कुमार, प्रा. कृष्णा वेदुला, डॉ. आर.चॅडविक, व डॉ. नंदकिशोर कोंडप हे मार्गदर्शन करणार आहेत.
सहावे सत्र शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १०.४५ वाजता ‘शिक्षणाचे अर्थशास्त्र’ या विषयावर होणार आहे. डॉ. रोशनलाल रैना, यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश, डॉ. अनिल के. गुप्ता, प्रा. देवीसिंग, प्रा. जी.एस.मूर्ती व अतुल कोईराला हे या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
या सहा विषयांवरील सत्रांसह ‘टीचर टू टीचर कनेक्ट’ ही दोन विशेष सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षकांना आपल्या विचारांचे आदान-प्रदान करता येणार आहे.
आपल्या देशाला अनेक चांगल्या शिक्षकांची परंपरा आहे. त्यांनी आपल्या शिकविण्यातून प्रेम आणि आदर मिळविला. ध्येय, आदर्शवाद आणि निःस्वार्थी सेवा हीच त्यांची ओळख आहे. त्यातील अनेकांनी केवळ ज्ञान दिले नाही, तर मूल्ये आणि आदर्शांच्या सहाय्याने समाजाला एक दिशा दिली. अशाच राष्ट्रउभारणीच्या भावनेने भारलेल्या आणि केवळ शिक्षक म्हणून नाही, तर उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष नॅशनल टीचर्स काँग्रेसचे प्रमुख निमंत्रक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे महासचिव डॉ. सुधाकरराव जाधवर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.डी.पी.आपटे व एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.