- पहिल्यांदाच दोन बाहा कार्यक्रम – पितमपूर आणि रोपर
- ३३८ प्रवेशिकांमधील २२१ महाविद्यालयांना मिळणार अंतिम फेरीत प्रवेश
पुणे – महिंद्र अँड महिंद्र लि. ने एसएईइंडिया या ऑटोमोटिव्ह इंजिनियर्ससाठी असलेल्या व्यावसायिक संघटनेच्या सहकार्याने आज बहुप्रतिक्षित बाहा मालिकेच्या अकराव्या आवृत्तीचा प्रारंभ होत असल्याचे जाहीर केले. या आवृत्तीची अंतिमफेरी इंदौरजवळील पितमपूर येथील नॅट्रिप सुविधा केंद्रात २४ ते २८ जानेवारी २०१८ दरम्यान होणार असून त्यानंतर आयआयटी रोपार येथे ८ ते ११ मार्च २०१८ दरम्यान पार पडणार आहे.
बाहा एसएईइंडिया २०१७ साठी एकूण ३८८ प्रवेशिका आल्या होत्या, ज्यामधील १८० संघांची पारंपरिक बाजासाठी निवड करण्यात आली, तर ४१ संघ ईबाजासाठी व्हर्च्युअल फेरीतून निवडण्यात आले.
बाहा एसएईइंडियाने विद्यार्थ्यांना तीन दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेत सहभागी होण्यासाठी एकच सीट असलेल्या चार चाकी ऑल- टेरेन व्हेइकलची (एटीव्ही) संकल्पना, बांधणी, चाचणी आणि अधिकृतता इत्यादी तयार करायला सांगितले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमात तांत्रित तपासणी, स्टॅटिक विश्लेषण उदा. डिझाइन, खर्च आणि विक्री साजरीकरण तसेच डायनॅमिक इव्हेंट्स उदा. अक्सलरेशन, स्लेज पुल, सस्पेंशन- ट्रॅक्शन आणि गतीशीलता यांचा समावेश असेल.
बाहा एसएईइंडियाचे उल्लेखनीय, अभिनव वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये दरवर्षी नव्या संकल्पनेचा अवलंब केला जातो. यावर्षी बाहा २०१८ ची संकल्पना ‘ग्राउंड टु ग्लोरी’ ही असून ती शून्यापासून सुरुवात करत वर्षभर संघर्ष आपले स्वप्न पूर्णत्वाला नेणाऱ्या उदयोन्मुख इंजिनियर्सची तळमळ, मेहनत, चिकाटी साजरी करणारी आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या आव्हानावर मात करून यश मिळवण्याच्या वृत्तीला सलाम करणारी आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांचा प्रवास आणि त्यांच्याकडून प्रत्येक सीमेला दिले जाणारे आव्हान यांचे प्रतीक असून त्यामुळे बाहा हा कार्यक्रम त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व लोकांना यश प्रदान करणारी आहे.
बाहा एसएईइंडियाने २०१५ मध्ये भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी ईबाहा मालिका सुरू केली. एमबाहा गाड्या १० एचपी आणि बी अँड एस गॅसोलिन इंजिन जे सर्व १८० संघांसाठी सारखेच असते त्यावर चालते, तर ईबाहा गाड्या इलेक्ट्रिक मोटर आणि चार्ज करण्यायोग्य लिथियम- इयॉन बॅटरीद्वारे विजेवर चालतात.
बाहा २०१८ मध्ये पुण्यातील २५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून त्यातील महाराष्ट्रातील ६४ प्रवेशिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. बाहा मालिकेच्या गेल्या काही आवृत्त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रवेशिक पुणे शहरातील होत्या. पुण्यातील महाविद्यालयांनी गेल्या काही वर्षांत अंतिम फेरीत सर्वाधिक बक्षिसेही मिळवली आहेत. बाहा २०१७ मध्ये प्रतिष्ठित बक्षिस कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेने व त्याखालोखाल पुण्यातीलच अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने बक्षिस मिळवले होते. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणेला ‘बेस्ट ईबाहा टीम’ पुरस्काराचे विजेते घोषित करण्यात आले होते.
बाहा पुरस्कारासाठी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे जुलै २०१७ मध्ये चित्कारा विद्यापीठ, चंडीगढ येथे झालेल्या व्हर्च्युअल फेरीत चाचणीत परीक्षण करण्यात आले. इथे त्यांनी अंतिम फेरीसाठी बाहा बगी गाडीचे त्यांना इच्छित असलेले डिझाइन दाखल केले.
कॅड डिझाइन, सीएई विश्लेषण, रोल केजचे डिझाइन, सस्पेंशन, स्टिअरिंग आणि ब्रेक्स तसेच रूल बुक व्हायवा सत्र आणि त्यांना आयत्या वेळेस देण्यात आलेल्या विषयाच्या विश्लेषणावरून या संघांची निवड करण्यात आली. व्हर्च्युअल बाहादरम्यान सादर करण्यात आलेल्या प्रवेशिका दिलेल्या सूचना व तपशीलांनुसार बनवण्यात आलेले नमुने होते. अंतिम फेरीतील संघांना त्यांची स्वतःची बगी रेस कार तयार करत आपले वाहन क्षेत्रातील आपले कौशल्य, आकलन आणि तळमळ दाखवून द्यायची होती.
याप्रसंगी श्री. पवन गोएंका, व्यवस्थापकीय संचालक, महिंद्र अँड महिंद्र लि. म्हणाले, ‘बाहा एसएईइंडिया २०१८ शी नाते जोडताना महिंद्रला आनंद होत आहे. बाजासोबत आम्ही महिंद्रची सतत प्रगती करण्याची विचारसरणी पुढे नेत आहेत. यंदा पितमपूर आणि आयआयटी रोपार या ठिकाणी मिळून दोन बाहा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ही बाहा एसएईइंडियाची वाढती लोकप्रियता आणि राष्ट्रीय महत्त्व यांची पावती देणारी आहे. यंदा ग्राउंड टु ग्लोरी ही संकल्पना साजरी करत असताना मला आनंद वाटतो, की बाजा एसएईइंडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जे तरुण इंजिनियरींग गुणवत्तेला वर्गात मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर मशिनरी तयार करत विजय मिळवण्यासाठी संधी देते.’
श्री. मुकेश के. तिवारी, आयोजक, बाहा एसएईइंडिया २०१८ आणि उप व्यवस्थापक महिंद्र टु व्हीलर्स लि. म्हणाले, ‘ या वर्षी एकंदर सहभाग २०१७ मध्ये १८ टक्क्यांनी वाढला आहे, तर एम- बाहा विभागातील सहभागात ३३ टक्क्यांची वाढ आहे. एम- बाहासाठी आमच्याकडे १२० संघ, तर पितमपूर आणि आयआयटी- रोपार येथील ई- बाहासाठी ३७ संघ आहेत.’
बाहा एसएईइंडिया बद्दल
बाहा एसएईइंडिया हा इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांसाठीचा शैक्षणिक उपक्रम असला, तरी तो वर्गाच्या चौकटीबाहेरचे व्यवहारिक ज्ञान मिळवून देण्यास मदत करतो. देशभरातील इंजिनीअरिंगचे विद्यार्थी इथे एक टीम म्हणून सहभागी होऊ शकतात तसेच त्यांना इंडस्ट्रीत वावरताना येणाऱ्या आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभवही घेता येतो. एसएई इंटरनॅशनलने सर्वात आधी अमेरिकेत सुरू केलेली मिनी बाहा एसएई स्पर्धा आज विविध देशांमध्ये आयोजित केली जाते. भारतात बाहा एसएईइंडिया नावाने तिचे आयोजन केले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीच्या या स्पर्धेत जगभरातील विद्यापीठे सर्व प्रदेशांत चालू शकणारी कार डिझाइन, फॅब्रिकेट करून तिची तपासणी घेऊ शकतात. त्यानंतर स्टॅटिक, डायनॅमिक आणि टिकाऊपणासाठी असलेल्या डिझाइन, किंमतीची मीमांसा, सादरीकरण, अक्सलरेशन, चढ चढणी आणि सहनशीलता अशा पातळ्यांवर तिची चाचणी घेतली जाते.
इतक्या वर्षांत बाहाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे तो राष्ट्रीय पातळीवरचा मोठा कार्यक्रम ठरला आहे. बाहा एसएईइंडिया मालिका तरुण, उत्साही, गुणवान इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना वाहनउत्पादन क्षेत्राबद्दल असलेली आवड दाखवण्यासाठी संधी देते, शिवाय त्यांना सर्व प्रदेशांत चालू शकणारी चारचाकी, एक आसन असलेली गाडीची संकल्पना मांडण्यापासून तिचे डिझाइन बनवण्यापासून आणि फॅब्रिकेट करण्यापर्यंत पूर्णपणे तयार करण्यासाठी प्रोत्साहन देते.
बाहा स्टिअरिंग समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. पवन गोएंका यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्थापना झाल्यापासूनच महिंद्र या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या पाच वर्षांपासून महिंद्र या कार्यक्रमाचा शीर्षक प्रायोजक असून यावर्षीसुद्धा ही परंपरा सुरू ठेवताना त्यांना अभिमान वाटत आहे. त्याशिवाय एआरएआय, अल्टेर, आनंद ऑटोमोटिव्हज, अनेसिस, एएसडीसी, एव्हीएल, भारत पेट्रोलियम, बीकेटी, बॉश, ब्रिग्ज अँड स्ट्राटॉन, चित्कारा विद्यापीठ, काँटिनेंटल, कमिन्स, डेल्फी, एलिएशन, एंड्युरन्स, जीएम, आयएसी, आयसीएटी, आयटीडब्ल्यू केमिन, जॉन डिअरे, लिअर, एल अँड टी, मॅथ वर्क्स, मेदांता हॉस्पिटल, मेंटॉर ग्राफिक्स, एम पी. कन्सलटिंग, नॅटिप, ओयो रूम्स, पद्मिनी इंजिनियरिंग, पोलारिस, प्रिया इव्हेंट्स, रॅडिसन हॉटेल्स, व्हॅरॉक, व्होल्वो, वुर्थ आणि झिटाडेल हे ही अभिमानाने आपला पाठिंबा या कार्यक्रमासाठी देत आहेत. त्याशिवाय एसआयएएम आणि एसीएमए यांचाही या कार्यक्रमाला पाठिंबा लाभलेला आहे.
ईबाहा बद्दल
ईबाहा हा बाहा एसएईइंडियाच्या एससी आणि ओसी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे, ज्यात दरवर्षी १००० इंजिनियरिंग विद्यार्थी भाग घेतात. भारतातील उदयोन्मुख इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी २०१५ मध्ये श्री. सुबोध मोर्ये यांच्या आयोजनाखाली आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली. या व्यासपीठावर इंजिनियरिंग विद्यार्थ्यांना बाहा रूलबुकनुसार इलेक्ट्रिक गाडी तयार करण्याची आणि ही गाडी इलेक्ट्रिक ताकदीच्या सहाय्याने काय कमाल करते हे अनुभवण्याची संधी मिळते. यातील एका सत्रादरम्यान हिज एक्सलन्सी स्वर्गीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती, भारत यांनी आयोजक समितीला या व्यासपीठाचा देशाच्या समृद्धीसाठी वापर करण्याची सूचना दिली होती. त्यांच्या विचारांनी भारावलेल्या आयोजक समितीने आठव्या सत्रात ई- बाहा हा एक उप- कार्यक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. नेहमीचा बाहा कार्यक्रम पेट्रोलवर चालणाऱ्या एटीव्हीवर आधारित असून ईबाहा गाड्या रिचार्ज होऊ शकणाऱ्या लिथियम इयॉन बॅटरी पॅकची जोड लाभलेल्या इलेक्ट्रिक मटोरवर चालतात.
ईबाहा ही इलेक्ट्रिक बाहा एटीव्हीवर आधारित संकल्पना असून ती इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर देते. जीवाश्म इंधन बनण्यासाठी सौर उर्जेची कित्येक वर्ष खर्च होतात आणि अतिश दुर्मीळ भौगोलिक परिस्थितीत ती तयार होतात व निसर्गासाठी धोकादायक असतात. म्हणूनच आपल्याला उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि मानवनिर्मित हवामानबदल स्थिर करण्यासाठी शाश्वत तसेच स्वच्छ तंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय इंधनाचे हे स्त्रोत चिरकाल टिकणारे नसल्यामुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो. त्याआधीच आपल्याला वाहतुकीसाठी पर्यायी उर्जा स्त्रोत तयार करणे व शाश्वत विकास साधणे आवश्यक आहे. म्हणूनच इलेक्ट्रिक मोबिलिटीला चांगले भविष्य असेल आणि ते देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असे आम्हाला वाटते.