भाजपच्या राजकारणात बहुजन नेत्यांची घुसमट
पुणे- आरएसएस चा चेहरा म्हणून ओळखल्या जावु लागलेल्या,2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर सुरु असलेल्या भाजपान्तर्गत राजकारणात मराठा आणि बहुजन समाजातील नेत्यांची उपेक्षा होताना दिसू लागली आहे. मुंडे यांच्या मृत्यूनंतर आता खडसे ,राणे यांची पक्षान्तर्गत नेतृत्वाच्या दुय्यम स्थानीच सुरू राहिलेला संघर्ष ,पुण्यातून भाजपचा बहुजन चेहरा अशी ओळख निर्माण झालेल्या काकड़े यांचे पाय खेचण्याचे सुरु असलेले राजकारण अशा गोष्टींची पार्श्वभूमी या’बहुजनांची घुसमट’या वृत्ताला लाभणार आहे*
लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे, राज्यातील भाजपातंर्गत काही नेत्यांची घुसमट वाढली असल्याचे बघावास मिळत आहे. पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे मंत्रीपदावरून दूर केल्यापासून नाराज आहेत. त्यांची असलेली नाराजगी त्यांनी अनेकदा बोलावून दाखविली. मात्र, मंत्रीपदाच्या गाजरापलीकडे खडसे यांच्या हाती काहीही लागलेले नाही. याउलट खडसे यांचे कट्टर विरोधक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद देऊन, खडसे यांचे खच्चीकरण करत असल्याची चर्चा पक्षातंर्गत आहे. यातच मुख्यमंत्री यांनी खासदारांच्या कामगिरीचे सादर केलेल्या अहवालात खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांची कामगिरी सरस नसल्याचा बोलबोला करत, त्यांचे तिकीट कापण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे खडसे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याची भाषा सुरू केली आहे. खडसे यांच्या पाठोपाठ ओबीसी चेहरा असलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या देखील पक्षातंर्गत नाराज असल्याची चर्चा आहे. चिक्की प्रकरणावर मुख्यमंत्री यांनी त्यांना अभय दिल्याचे वरवर दाखविले असले तरी, मुंडे यांचे जलयुक्त खाते काढून घेत त्यांची कोंडी केली. भगवान गडावरील मुंडे वाद चिघळण्यासही पक्षातंर्गत नेत्यांची रसद असल्याची खुलीआम चर्चा आहे. भाजपा वाढविण्यात सिंहाचा वाटा असलेले स्व. गोपनीथ मुंडे यांचा फोटो अनेक कार्यक्रमांच्या होर्डींगवरून गायब करून पंकजा यांना शह देण्याचे प्रकार अनेकदा झाले. कॉंग्रेसला शह देण्यासाठी बुलंद तोफ नारायण राणे यांना सुरूवातीस भाजपात प्रवेशाचे अमिष दाखविण्यात आले. मात्र घटकपक्ष शिवसेनेची थेट नाराजी नको यासाठी त्यांना स्वाभिमानी पक्षाची स्थापना करण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्या पक्षाला एनडीएचे घटक पक्ष करून घेतले. मात्र, सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेची होणारी सातत्याने होणारी टिका लक्षात घेऊन अखेर राणे यांना डावलण्याचे काम पक्षातंर्गत सर्रासपणे करण्यात आले. राणेंना बळ देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्यावरच पक्षांतील नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले. . पुण्यातून भाजप ला लाभलेला बहुजन-मराठा चेहरा देखील आता भाजपा पासून दूर होऊ लागल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेलेले संजय काकडे यांनी नोटाबंदीच्या समर्थनार्थ पुण्यातून काढलेली रॅली आणि महापालिकेच्या निवडूनकीत निवडून आणलेले 100 नगरसेवक यात काकडेंचे योगदान सर्वश्रुत आहेच.पण मुख्यमंत्री फडणवीस यांचे हात पुण्यातून बळकट करण्याचे काम कोणी केले असेल तर या बाबतही काकडेंचे नाव पुढे येते.
*पुण्यातला बहुजनांचा-मराठ्यांचा भाजप चा चेहरा अशी ओळख काकडे यांची झाली असताना 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या राजकारणात मात्र भाजपच हा स्वतः चा चेहरा उखडून फेकण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते आहे.आणि यात भाजप मधील अंतर्गत राजकारण यशस्वी झाले तर मात्र भाजप ला मोठा झटका बसण्याची शक्यता कोणी नाकारू शकणार नाही*