पुणे – ज्येष्ठ आणि प्रख्यात साहित्यिक आनंद यादव यांचे रविवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील धनकवडी येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत
आनंद यादव हे मुळचे कोल्हापूरचे आहे. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ मध्ये झाला होता. मराठीत त्यांनी विपूल प्रमाणात लेखन केले आहे.
यामध्ये काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ’संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोल करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.
प्रकाशित साहित्य
आनंद यादव यांनी सुमारे ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे-
काव्यसंग्रह
हिरवे जग १९६०मळ्याची माती१९७८मायलेकरं (दीर्घकविता)१९८१
कथासंग्रह
खळाळ १९६७घरजावई १९७४माळावरची मैना १९७६आदिताल १९८०डवरणी (पुस्तक) १९८२उखडलेली झाडे १९८६
व्यक्तिचित्रे
मातीखालची माती (१९६५)
ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथसंपादन करा
स्पर्शकमळे (१९७८)पाणभवरे (१९८२)१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाहआत्मचरित्र मीमांसामराठी लघुनिबंधाचा इतिहासग्रामीणता : साहित्य आणि वास्तवग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्यामराठी साहित्य : समाज आणि संस्कृती
कादंबरी
गोतावळा १९७१नटरंग (पुस्तक) १९८०. या कादंबरीवर त्याच नावाचा मराठी चित्रपट निघाला.एकलकोंडा १९८०माऊली १९८५संतसूर्य तुकाराम
आत्मचरित्रात्मक
झोंबी १९८७. या कादंबरीवर लवकरच मराठी चित्रपट बनेल, अशी बातमी आहे.नांगरणी १९९०घरभिंती १९९२काचवेल
बालकथा
उगवती मने