पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. बारावीचा राज्याचा एकूण निकाल ८५.८८ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल २.५३ टक्क्याने घटला आहे. यंदाही निकालात मुलीच सरस ठरल्या असून उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा ७.८५ टक्क्यांनी अधिक आहे.
मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.२५ तर मुलांचा निकाल ८२.४० टक्के आहे. विज्ञान शाखेचा ९२.६०, कला शाखा ७६.४५, वाणिज्य ८८.२८ आणि व्यवसाय अभ्यासक्रम ७८.९३ असा निकाल लागला आहे. राज्याच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. त्यानंतर अनुक्रमे पुणे विभाग ८७.८८, नागपूर ८२.५१, औरंगाबाद ८७.२९, मुंबई ८३.८५, कोल्हापूर ८७.१२ , अमरावती ८७.५५, नाशिक ८४.७७, लातूर८६.०८, कोकण ९३.२३ असा निकाल लागला आहे.
विज्ञान, कला आणि वाणिज्य अशा सर्वच शाखेचा निकाल यंदा घसरल्याचे राज्य शिक्षण मंडळ अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सांगितले. राज्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९२.६० टक्के, कला शाखेचा ७६.६० टक्के तर वाणिज्य शाखेचा ८८.२८ टक्के निकाल लागला आहे. गेल्यावर्षी विज्ञान शाखेचा ९५.८५ टक्के, कला शाखाचे ७८.९३ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८९.५० टक्के निकाल लागला होता. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकालही यंदा घसरला आहे. गेल्यावर्षी ८२.१८ टक्के निकाल लागला होता तर यंदा ७८.९३ टक्के निकाल लागला आहे.
संपूर्ण राज्यात तब्बल ४,४७० विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. विभागानिहाय निकाल पाहिल्यास यंदा पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के लागला आहे.
mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC)चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली आली होती. यंदा नऊ विभागातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.
येथे पाहा निकाल –
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
and mahahsscboard.maharashtra.gov.in.
विभागनिहाय असा आहे निकाल
– औरंगाबाद 87.29%
– नाशिक 84.77%
– लातूर 86.08%
– अमरावती 87.55%
– मुंबई 83.85%
– पुणे 87.88%
– नागपूर 82.51%
– कोल्हापूर 87.1%
– कोकण 93.23%