मुंबई-ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याच्या प्रवृत्तीला पायबंद आणि स्वच्छतेला चालना देण्याचा भाग म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. आणि त्यांचे सामाजिक दायीत्व उपक्रम (सीएसआर) भागीदार मुकूल माधव फाऊंडेशन (एमएमएफ) यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सोनाले या आदिवासी क्षेत्रात ५० व्यक्तिगत शौचालये सौर ऊर्जेवर आधारीत दिव्यांसह बांधून दिले आहेत. ही शौचालये व्यक्तिगत वापरासाठी आणि लाभार्थी व्यक्तीच्या नामफलकासह तयार करण्यात आली आहेत. शिवाय चांगल्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी बाणवल्या जाव्यात म्हणून प्रत्येक लाभार्थीस एक मग आणि एक बादलीदेखील दिली गेली आहे. दुसऱ्या टप्प्यात मुकूल माधव फाऊंडेशनने पुणेस्थित झेएफ स्टीअरिंग गीअर कंपनीला आणखी ५० शौचालयांच्या बांधणीसाठी योगदान देण्याला प्रोत्साहित केले आहे. झेडएफ गीअरबरोबरीनेच, हिंदुजा समूह देखील या प्रकल्पाला पाठबळाला पुढे आला असून, तिसऱ्या टप्प्यात २३ शौचालये आणि या परिसरातील जलसाठ्याच्या संवर्धनाच्या प्रकल्पालाही मदत केली जाणार आहे. ज्यामध्ये गाळ उपसा, फिल्टरिंग, विंधण विहिरी तयार करणे आणि विद्यमान विहिरी व बांधांची दुरुस्ती करणे अशा कामांचा समावेश आहे.
मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु छाब्रिया म्हणाल्या, “स्वच्छता आणि सफाईच्या योग्य सुविधा रोग पसरविण्यास प्रतिबंध करण्यासह निरोगी कुटुंब आणि सुदृढ समाजाची खात्री देतात. आम्ही एमएमएफ / फिनोलेक्समध्ये नेहमी स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिलो आहोत आणि केएसडब्ल्यूएच्या सहकार्याने उघड्यावर शौचाच्या सवयीचे धोके समजावून देताना अधिक सक्रिय भूमिका आम्ही बजावू इच्छितो. आम्ही या उपक्रमाद्वारे सबंध समाजाला एक मजबूत संदेश पाठवू इच्छितो.”
“समविचारी कॉर्पोरेट कंपन्यांना या प्रकल्पासाठी एकत्र आणून फिन्लेक्स आणि एमएमएफने प्रकल्पाची व्याप्ती वाढविली आहे, ज्यामुळे मोठ्या लाभार्थींच्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतील,” असे पुस्तीही छाब्रिया यांनी जोडली.
“या उत्कृष्ठ उपक्रमाचा आम्हीही एक भाग बनलो हे खूप आनंददायी आहे,” असे झेडएफ स्टीअरिंग गीअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष मुनोत यांनी नमूद केले.
मुकुल माधव फाऊंडेशन द्वारे सुरू करण्यात आलेला हा एक चांगली उपक्रम लाभार्थींना समाजाचे ऋण फेडण्याचे प्रोत्साहन आणि शिक्षण देत आहे. एक प्रतिकात्मक रक्कम प्रत्येकी २००० रुपये संकलित केले जात आहेत आणि भारत सरकारच्या सैनिक कल्याण निधीकडे पाठविले जात आहेत, (नोंदणी क्रमांक. 453 / 2014-15 / 956 www.mahasainik.com) जो सैनिकांच्या विधवांच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी वापरात येतील.
मुंबईपासून ११५ किमी दूर अंतरावर स्थित, पालघर जिल्ह्यात आदिवासींची मोठी लोकसंख्या आहे. जरी हा जिल्हा ठाणे आणि मुंबईच्या अगदी जवळ असला, तरीही जिल्ह्यातील काही गावे मूलभूत सुविधांच्या अभावी अत्यंत अविकसित आहेत. म्हणून, फिनोलेक्स आणि एमएमएफने स्वच्छता आणि पाण्याशी संबंधित कल्याणकारी योजनांमधील अभावग्रस्ततेचे अंतर कमी करण्याचा निर्णय घेऊन येथे हा प्रकल्प सुरू केला आहे.