नागपूर, दि. 20 : उपराष्ट्रपतीच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये पावसामुळे झालेल्या गळतीचा अहवाल प्राप्त होताच. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिला. विधानपरिषदेत अंतिम आठवड्याचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पुणे महापालिकेतील गळतीच्या विषयावर लक्षवेधी सूचना दाखल झाली होती. त्यावरील चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बापट पुढे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाघाटन प्रसंगी 17 जून 2018 रोजी सभागृहात मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती झाली होती. त्याचे तीव्र पडसाद पुण्यात उमटले होते. त्यानंतर या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली .या घटनेची चौकशी करून त्याचा अहवाल शासनाकडे तातडीने पाठवावा. असे आदेश पुणे महानगरपालिकेला देण्यात आले आहेत .उद्घाटनाच्या दिवशी पुण्यात एका तासात 55 मिमी पाऊस झाला. मुख्य सभागृहाच्या छतावर पडलेले पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नळ्या चोकअप झाल्या .त्यामुळे समारंभ चालू असतांनाच छतावर खूप पाणी साठले. डेकशीट व त्याच्या खालचे बांधकाम यातून सभागृहाच्या एका बाजूला पाण्याची गळती झाली. त्यानंतर चोकअप झालेली वाहिनी मोकळी करण्यात आली. अशी प्राथमिक माहिती शासनाला उपलब्ध झाली आहे.
बापट पुढे म्हणाले की घुमटाकार छतातून पाण्याची गळती तेव्हाही झाली नव्हती आणि आताही होत नाही. तथापि गळतीचा हा सर्व परिसर अभियंत्याकडून तपासण्यात येत आहे . त्यांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत. बापट पुढे म्हणाले कोथरूड मुंढवा व मौजे बाणेर येथील काही जमिनीच्या आरक्षणासंदर्भात शासनाकडे लोकप्रतिनिधींनी पाठवलेली निवेदने प्राप्त झाली आहेत त्याबाबच्या सूचना व हरकती विचारात घेऊन संबंधिताची सुनावणी घ्यावी. व शासनास अहवाल सादर करावा .असे आदेश नगररचना विभागाला देण्यात आले आहेत .तो प्राप्त झाल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल . या संदर्भात विधान परिषदेत आज लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावर खुलासा करताना कोथरूड येथील सर्वे नंबर 159, 160 व 167याचा काही भाग याचा निवाडा झाला असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. शिवणे गावच्या पूरग्रस्तांसाठी ही जागा आहे .त्यावरील खेळाचे मैदान अग्निशामक दल व प्राथमिक शाळा यांच्या आरक्षणाचा फेरविचार व्हावा. अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे. मुंढवा येथील विकास योजनेत बदल करावा. अशीही विनंती नागरिकांनी केली आहे. या सर्व हरकतीच्या अहवालांची आम्ही वाट पाहत आहोत.
पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक यंत्रणा या विषयाचा संदर्भही गिरीश बापट यांनी दिला. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता असे सांगून ते म्हणाले की राज्यातील दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरातील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी उमटा ( UMTA ) ची स्थापना मुंबईसाठी करण्यात आली आहे तथापि पुण्याच्या बाबतीत मात्र पुणे महानगर महानगरपालिका विकास प्राधिकरण यांच्याकडून कुमटाचे काम होणे अपेक्षित आहे . मेट्रो सह वाहतुकीचे सर्व प्रश्न प्राधिकरणाकडून सोडविणे जातील .असे स्पष्टीकरण सभागृहात एका उत्तराद्वारे करण्यात आले.