खेरा म्हणाले- ‘‘सुप्रीम कोर्टात सोमवारी एक जनहीत याचीका दाखल केली आहे. यात पंतप्रधान नेरंद्र मोदींच्या संपत्तीबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे, कारण त्यांनी याबाबत चुकीची माहिती दिली आहे. मोदी मुख्यमंत्री बननल्यानंतर ही जमीन घेण्यात आली. 2007 त्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी गांधीनगरच्या सेक्टर -1 मध्ये एक भूखंड असल्याचा उल्लेख आपल्या निवडणूक अर्जात केला, ज्याचे क्षेत्रफळ त्यांनी 326.22 मीटर असल्याचे सांगितली. याची किंमत 1.3 लाख रूपये असल्याची माहिती मिळाली. बाजार भावानुसार त्याची किमंत आता 1.2 कोटी रूपये आहे.”
ते पुढे म्हणाले की, ‘‘2012 च्या विधानसभा निलडणुकीत त्यांनी भूखंड संख्या 411 चा उल्लेख आपल्या अर्जात केला नाही. त्यांनी दुसरे भूखंड 401/ए चा उल्लेख करताना म्हणाले की, ते याची मालक आहे. याचे क्षेत्रफळ 326.22 वर्गमीटर सांगितले. त्यासोबत पंतप्रधानांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीतदेखील भुंखड 411 चा उल्लेख केला नाही, तर 401/ए चा उल्लेख केला. त्यांनतर त्यांनी आपल्या वेबसाइटवर आपल्या संपत्तीची घोषणा केली, त्यात 401/ए भुखंडाचा उल्लेख करताना म्हटले की, ते याचे एक चतुर्थांश मालक आहेत. त्यामुळे आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी कठोर कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.