नवी दिल्ली – 1 जुलैपासून बँकिंग, रेल्वे आणि गाड्यांच्या किमतींसह अनेक मोठे बदल होणार आहे. यातील काही बदल दिलासा देणारे तर काही अडचणी वाढवणारे असतील. 1 जुलैपासून रेल्वेने अनेक गाड्यांचा वेळ आणि नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तर बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहारांवर आकारले जाणारे शुल्क बंद करण्यात येणार आहे.
बँकिंग क्षेत्रात होणारे बदल
रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून ऑनलाइन व्यवहारांवर आकारण्यात येणारे एनईएफटी, आरटीजीएस शुल्क 1 जुलैपासून बंद होणार आहेत. यामुळे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांनी दिलासा मिळणार आहे.
एसबीआयने आपल्या गृह कर्जवारील व्याज दर रेपो रेटशी जोडणार आहे. यामुळे रेपो रेटच्या बदलानुसार गृह कर्जाच्या व्याजात वाढ किंवा घट होणार आहे.
वाहनांबाबत होणारे बदल
1 जुलैपासून अनेक रेल्वे गाड्यांचे वेळपत्रकात बदल होणार आहे. तसेच काही गाड्यांची नावे देखील बदलण्यात येणार आहे.
सुरक्षा मान लागू केल्यामुळे महिंद्राच्या पॅसेंजर कार 36 हजार तर मारुती डिझायर 12 हजार 700 रूपयांपर्यंत महाग होणार आहे.
बजत योजनांबाबत होणारे बदल
1 जुलैपासून तीन महिन्यांपर्यंत सुकन्या समृद्धि, पीपीएफ सारख्या लहान बचत योजनांवरील व्याजदरांत 0.1 टक्क्याची कपात करण्यात येणार आहे.