मुंबई- शिवसेना आणि भाजपचं तुटता..तुटता..जुळलं आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांत अखेर युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत केली. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वीअमित शहा यांनी शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या तर उद्धव ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत ‘फिफ्टी-फिफ्टी’ अर्थात 144/144 जागा लढवणार आहे.काही मुद्द्यांमुळे भाजप-शिवसेनेमध्ये मतभेद आहे. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्त्वाचा दुवा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित शेतकर्यांना लाभ मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शेतकरीहिताच्या निर्णयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पीकविम्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोकणातील नाणार प्रकल्पाची जागेबाबत स्थानिकांना विश्वासात घेण्यात येणार आहे.शिवसेना आणि भाजपमध्ये पदासाठी नव्हे तर जनहितासाठी चर्चा झाली. मुंबईतील 500 चौरस फुट घरांना कर लागणार नाही.
दरम्यान, अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये युतीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली. विशेष म्हणजे त्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेच्या ठिकाणी अर्थात वरळी सीफेस येथील हॉटेल ब्लू सीमध्ये पोहोचले. गाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील बसले होते.
पत्रकार परिषदेतील महत्त्वपूर्ण मुद्दे..
काही मुद्द्यांमुळे भाजप-शिवसेने मध्ये मतभेद- मुख्यमंत्री
दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्त्वाचा दुवा- मुख्यमंत्री
लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेनेत युती, मुख्यमंत्र्यांकडून युतीची घोषणा
शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आग्रही- मुख्यमंत्री
कर्जमाफीपासून वंचित शेतकर्यांना लाभ मिळणार- मुख्यमंत्री
शेतकरीहिताच्या निर्णयांना प्राधान्य देण्यात येणार- मुख्यमंत्री
पीकविम्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार- मुख्यमंत्री
कोकणातील नाणार प्रकल्पाची जागा बदलणार, स्थानिकांना विश्वासात घेणार
दोन्ही पक्षात जनहितासाठी झालेली चर्चा- मुख्यमंत्री
मुंबईतील 500 चौरस फुटाच्या घरांना कर नाही
लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढणार
विधानसभा निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टीचे सूत्र
पालघरची जागा शिवसेनेला दिली जाईल. जागावाटपातही फिफ्टी-फिफ्टी’चे सूत्र असेल. उपमुख्यमंत्रिपद मात्र नसेल. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोन्ही पक्षांतील आघाडीची बोलणी आता जागावाटपापर्यंत नेली आहे. यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत दोन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या सतत बैठका सुरू आहेत. शरद पवारही स्वतः माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत.
असे असेल सूत्र
– उद्धव ठाकरे यांनी पालघरचे स्वर्गीय आमदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला खासदार करण्याचे आश्वासन दिले असल्याने शिवसेना पालघरसाठी आग्रही होती.
– अखेर काँग्रेसमधून भाजपमध्ये येत खासदार झालेल्या राजेंद्र गावित यांच्या नावावर फुली मारून मुख्यमंत्र्यांनी पालघर शिवसेनेला देण्याचे मान्य केले.
-युती झाल्यानंतर सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रिपद नसेल आणि शिवसेना-भाजपला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा कालावधी देण्याबाबत सहमती.