‘आम्ही या अर्थसंकल्पाकडे सकारात्मकपणे पाहात आहेत, कारण त्यात जाहीर करण्यात आलेली विविध प्रकारची धोरणे सरकार ग्राहकांना वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेल्या सवलतींच्या मदतीने या क्षेत्राच्या विकासासाठी पाया रचण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्प 2019 मध्ये भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दमदार मार्ग तयार व्हावा यासाठी पाया रचण्यात आला आहे.’
आधार आणि पॅन कार्ड या दोन्हींच्या समान वैधतेमुळे ग्राहकांना दागिन्यांसारख्या महागड्या वस्तू खरेदी करताना लक्षणीय मदत होणार आहे.
मूलभूत सुविधांसाठी प्रस्तावित 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक लक्षात घेता आम्ही पायाभूत सुविधा क्षेत्राचे भविष्य उज्जवल असल्याचे व त्याचा आम्हाला फायदा होणार असल्याचे गृहीत धरत आहोत, कारण त्यामुळे पर्यायाने ग्राहकांकडे खर्चासाठी जास्त रक्कम राहील आणि अशावेळेस मौल्यवान रत्ने व दागिने उद्योग क्षेत्रातील नफ्यासह परताव्यांचा आकर्षक गुंतवणूक पर्याय त्यांच्यापुढे असेल.
त्याशिवाय बजेटमध्ये एनआरआय आणि एफपीआय (परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार) यांचे एकत्रीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे भारतातील एनआरआय फंडिंग वाढून अर्थव्यवस्थेत भांडवलाचा नवा ओध सुरू होईल. ही चांगले दिवस येणार असल्याची नांदी आहे.
मात्र, आयात केल्या जाणाऱ्या सोन्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर गेल्यामुळे सोने खरेदीच्या लघुकालीन भावनेवर परिणाम होईल आणि त्यामुळे बाजारपेठेतील सोन्याच्या बेकायदेशीर पुरवठ्यात वाढ होईल.
एकंदरीतच अर्थसंकल्पातील धोरणे प्रामुख्याने सरकारच्या मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया आणि भारतात व्यवसाय करण्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती करणे यांसारख्या योजनांकडे झुकणारी आहेत.
– श्री. टी एस कल्याणारामन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कल्याण ज्वेलर्स