श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दिशेने रविवारी (ता. 2) रात्रभर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारतातील कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
पाकिस्तानने गेल्या 12 तासांमध्ये दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू, राजौरी व पूँछ जिल्ह्यांमध्ये गोळीबार केला आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रथम गोळीबार केला. त्यानंतर रात्रभर गोळीबार सुरू होता. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) दिली.
दरम्यान, पाकिस्तानने जुलै महिन्यामध्ये 18 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले असून, 14 जवान जखमी झाले आहेत.