पुण्यातील `स्टुडंट कनेक्ट सेंटर‘चे उद्घाटन जाहीर
पुणे : ‘बैजूज्’, या भारतामधील शिक्षणक्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि देशातील के-12 अॅप सादर करणाऱ्या निर्मात्या कंपनीने, पुण्यात `स्टुडंट कनेक्ट सेंटर‘चे उद्घाटन करण्याचे जाहीर केले आहे.
अमर अविनाश कॉर्पोरेट प्लाझा, 11, बंड गार्डन रोड येथे स्थित असलेले, हे पुण्यातील पहिले ‘बैजूज्’च्या `स्टुडंट कनेक्ट सेंटर’ आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ‘बैजूज्’च्या अध्यापन उपक्रम आणि वैयक्तिक वैशिष्ट्यांचा अनुभव देणाऱ्या अॅपचे परिणाम समजण्यास मदत होणार आहे. ‘बैजूज्’चे तज्ज्ञ हे अॅप कसे वापरायचे ते दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरी त्यांच्या सोयीनुसार जातील. यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी 09243500457 या क्रमांकावर फोन करून सत्राचे आयोजन करायचे आहे. अन्य सहा कार्यालयांचे लवकरच उद्घाटन होईल.
या सेंटरद्वारे ‘बैजूज्’ला या प्रदेशात आपले नेटवर्क सखोल आणि विस्तारीत करता यावे, यासाठी लक्षणीय पाठिंबा दिला जाईल. पुण्यातील या विशेष सेट-अपच्या उद्घाटनाद्वारे, ‘बैजूज्’ महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांशी जोडले जाण्याचे ध्येय बाळगून आहे, याबरोबरच अधिक गुंतवणुकीच्या आणि वैयक्तिक अध्ययनाच्या अनुभवांद्वारे अधिक चांगले शिकता यावे यासाठी मदत केली जाईल.
14 लाख विद्यार्थ्यांसह ‘बैजूज्’ महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारी सेन्टर्स मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूर आदी ठिकाणीही कार्यरत आहे. याबरोबरच यवतमाळ, रत्नागिरी आणि हिंगोली यासारख्या लहान शहरे आणि नगरांमध्येही अलिकडच्या महिन्यांत कार्याला लोकांची पसंती लाभत आहे.
बीवाजेयूच्या महाराष्ट्रातील विकासाबाबत, ‘बैजूज्’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. मृणाल मोहीत म्हणाले की, “आमच्या पहिल्या `स्टुडंट कनेक्ट सेंटर’चे पुण्यात उद्घाटन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. केवळ पुण्यातून 1.25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व आसपासच्या प्रदेशातील विद्यार्थ्यांना या केंद्रातून तज्ज्ञांमार्फत, अॅपच्या वैशिष्ट्यांचे सखोल आकलन होण्यास मदत होईल. येत्या काही महिन्यांमध्ये आम्ही अन्य 6 केंद्र पुण्यात सुरू करत आहोत. 53 मिनिटांच्या एंगेजमेंट रेटमुळे राज्यातील आमची विद्यार्थी संख्या गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
खरं तर, इतक्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या आणि लहान शहरांमध्येही स्वीकृती मिळणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. या प्रदेशातील विद्यार्थ्यांमध्ये या अॅपची स्वीकृती झाल्याने ऑनलाइन अध्ययन प्रकाराला लोकप्रियता प्राप्त झाली आहे, येत्या काही वर्षांत, या प्रदेशातील जास्तीत जास्त मुले डिजिटल अध्ययनात क्रांती घडवण्यासाठी सज्ज असतील.”
मृणाल पुढे म्हणाले की, “यात अध्ययनाची महत्त्वाकांक्षा आणि प्रोत्साहन अतिशय उच्च आहे आणि या प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने उपक्रमांच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे, त्याद्वारे सेवा देण्याची खरी गरज आहे. प्रादेशिक भाषांमध्येही आमचे अॅप व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतातील सर्वात मोठा एज्युकेशन ब्रँड असलेले आम्ही सातत्याने नावीन्यपूर्ण पद्धतींचा शोध घेत आहोत, यामुळे महाराष्ट्रातील डिजिटल अध्ययानाच्या स्वीकृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.”
सध्या भारतभरातील लहान शहरे आणि नगरे यांतून 74 टक्के विद्यार्थी अॅपवर आहेत. पुढील वर्षी हा आकडा दुप्पट होईल, अशी ‘बैजूज्’ला अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या उच्चतम महत्त्वाकांक्षेमुळे आणि त्यांच्या दर्जात्मक संहिता आणि चांगल्या शिक्षकांबाबतच्या प्रश्नांमुळे जास्तीत जास्त विद्यार्थी तंत्रप्रवण अध्ययन उपक्रमाचा स्वीकार करत आहेत.
भारताच्या वैयक्तिक के-12 अॅपचे निर्माते – ‘बैजूज्’ ही `उत्तम शिक्षणासाठीची’ अग्रेसर संस्था आहे, तिच्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंशिक्षण घेता येते. ‘बैजूज्’च्या अध्ययनाची उत्पादने सगळ्या इयत्तांसाठी (चवथी ते बारावी) शिक्षण देते, यात स्पर्धात्मक परीक्षांसाठी चाचणी तयारी अभ्यासक्रमही चालवते. या अॅपद्वारे चौथी ते बारावीच्या वर्गांसाठी गणित आणि विज्ञान विषयासाठीही अभ्यासक्रम शिकवले जातात. अलिकडेच उद्घाटन करण्यात आलेल्या `पॅरेंट कनेक्ट’ अॅपद्वारेमुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती वेळोवेळी कळण्यास मदत होते, त्यामुळे आपल्या पाल्याचे कौतुक करता येतेच शिवाय त्यांच्या या अध्ययनाच्या प्रवासात पाठिंबा देण्याची भूमिका उत्तमप्रकारे बजावता येते.
वैयक्तिक स्तरावरील शिक्षण पुढील स्तरावर नेण्यासाठी, ‘बैजूज्’ने बिग डेटा अॅनालिसिसचा लाभ घेतला आहे, याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनाची माहिती घेत वैयक्तिक स्तरावरील हे अध्ययनाचे व्यासपीठ उभारता आले आहे. गुंतवणूक आणि परिणामकारक अध्ययनासाठी अॅपद्वारे वैयक्तिक स्तरावर विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास निर्माण करण्यात आला आहे, हा मार्ग अधिक लाभदायक असेल, शिवाय विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या क्षमतेचा आणि स्टाइलचा असेल, त्यासाठी मदत करणारा असेल.
‘बैजूज्’बद्दल :
‘बैजूज्’ ही भारतातील सर्वात मोठी एज्यु-टेक कंपनी आणि भारतातील सर्वात मोठी के-12 अध्ययन अॅप सादर करणारी निर्माती कंपनी आहे, तिच्यातर्फे चौथी ते बारावी (के-12)चे विद्यार्थ्यांसाठी उच्चतम स्वीकृती, गुंतवणूक आणि परिणामांच्या अध्ययन उपक्रमांचे सादरीकरण केले जाते, याबरोबरच जेईई, एनईईटी, कॅट, आयएएस, जीआरई आणि जीमॅट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठीही मदत केली जाते.
2015 साली उद्घाटन झाल्यापासून, ‘बैजूज्’ हे तब्बल 14 दशलक्ष वापरकर्ते आणि 9,00,000 वार्षिक पेड सबस्क्राइबर यांच्यासाठी सर्वात लोकप्रिय आणि प्राधान्यक्रम असलेले एज्युकेशन अॅप ठरले आहे. दर दिवशी तब्बल 3000 शहरे आणि नगरांमधील विद्यार्थी सुमारे 53 मिनिटे हे अॅप दररोज वापरतात. ‘बैजूज्’चे अॅप शिकणे अतिशय आनंददायी आणि परिणामकारक करते. वार्षिक नवीकरणीय दरही वाढता म्हणजेत 90 टक्के इतका आहे.
जागतिक स्तरावरील अध्ययनाचा अनुभव देताना, ‘बैजूज्’ अध्ययन अतिशय सोपे आणि दृश्यात्मक स्तरावर लक्षणयी करते, ते केवळ पद्धतीत अडकून पडत नाही. हे शिक्षणाचे अॅप नव्या पिढीचे, भौगोलिकदृष्ट्या अध्ययनाच्या सर्व उफलब्ध सामग्रीचा वापर करून, संवादात्मक संहितेचे आणि समजायला सोप्या अशा पद्धतींचे आहे.