पुणे-पुण्यातील कोंढवा येथील सीमा भिंत कोसळून दूर्घटना शनिवारी घडली होती. त्यानंतर आज पहाटे प्रकार पुन्हा आंबेगांव सिंहगड कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यृ झाला आहे. दुर्घटनेत राधेलाल पटेल (२५), जेटू लाल पटेल (५०), ममता राधेलाल पटेल (२२) आणि जेटू चंदन रवते अशी मृतांची आत्तापर्यंत समजलेली नावं आहेत. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
शनिवारी पुण्यातल्या कोंढवा भागात आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा दुसरी दुर्घटना घडून त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ठार झालेले मजूर छत्तीसगढचे रहिवासी आहेत असेही समजते आहे.
कोंढव्यातील घटनेत बिल्डर्सना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी काय कारवाई होणार? आणि असे किती जीवआणखीजाणारआहेत ?असा सवाल आता उपस्थित होतो आहे