पुणे : कॉंग्रेसच्या मोहन जोशी यांनी पाणी प्रश्नावर केलेले आरोप ..दुर्लक्षित करत ,ते अदखलपात्र आहेत असे सांगत ,पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज जून अखेर पर्यंत पुण्यात कोणत्याही प्रकारची पाणी कपात केली जाणार नाही असे घोषित केले मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरले पाहिजे असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला प्रत्येक दहा दिवसांनी पुण्याच्या आणि पुण्याच्या ग्रामीण भागाच्या पाण्याचा आढावा आपण घेणार असल्याचे ते म्हणाले.
धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट यांनी आज तातडीची बैठक बोलाविली होती. दुपारी महापालिका आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.तसेच महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे,नगरसेवक अमोल बालवडकर,योगेश मुळीक, तसेच आमदार जगदीश मुळीक,आमदार योगेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बापट यांनी सुमारे ४५ मिनिटे अधिकाऱ्यांशी चर्चा केली .शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत जुलै 15 पर्यंत पुरेल याचे नियोजन करण्यात आले आहे.